• Wed. Mar 11th, 2026
    Ashish Shelar: प्रत्येक किल्ल्याच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र समिती; सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांची घोषणा

    Ashish Shelar: या किल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत जाहीर केले.

    ashish shelar (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    मुंबई: शिवकाळातील बारा किल्ल्यांना युनेस्कोने वारसा यादीत स्थान दिल्याने या किल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण घोषणा केली. या किल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत जाहीर केले.

    या प्रत्येक किल्ल्याचा शास्त्रशुद्ध व्यवस्थापन आणि संवर्धन आराखडा तयार आहे. या किल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती असून, प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत त्या-त्या जिल्ह्यांतील स्वतंत्र समिती नेमण्यात आली आहे’, अशी माहिती शेलार यांनी दिली. ‘गडकिल्ल्यांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. अतिक्रमणे हटवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले.
    संतापजनक! पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीसोबत अधिकाऱ्याकडून वाईट कृत्य, नागपुरात मुंबईच्या PSIविरुद्ध गुन्हा दाखल
    देशभरातून आलेल्या सात प्रस्तावांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आपल्या प्रस्तावाची निवड केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली ते पॅरिस या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करण्यासाठी भक्कम बळ दिले. आता आमचा विभाग सर्व तांत्रिक आणि व्यवस्थापनात्मक बाबी हाताळण्यास सक्षम आहे. – आशिष शेलार, सांस्कृतिक मंत्री
    मुंबई अध्यक्षपदासाठी नवा चेहरा? प्रदेशाध्यक्षपदानंतर भाजपची पुन्हा चाचपणी, ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत
    गडकिल्ल्यांवर आनंदोत्सव
    पुणे/मुंबई/रायगड
    : ‘पोवाड्यांचे गायन, उंच फडकणारे भगवे झेंडे, पेढे वाटून साजरा केलेला आनंद अन् अखंडपणे छत्रपती शिवरायांचा जयजयकार… अशा अभिमानाने भारावलेल्या वातावरणात शनिवारी गडकिल्ल्यांवर आनंदोत्सव साजरा झाला. रायगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग किल्ल्यांसह मुंबईत काही ठिकाणी शिवरायांचा जयघोष घुमला.
    बोहल्यावर चढण्याआधीच काळाने साधला डाव; हळदीच्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, डॉक्टर तरूणासोबत काय घडलं?
    दर्जा टिकवून ठेवणे गरजेचे -राज ठाकरे
    मुंबई :
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना ‘युनेस्को’ ने जागतिक वारसा जाहीर केल्याच्या निर्णयाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वागत केले आहे. स्थळांचा दर्जा ‘किल्ल्यांची नीट काळजी घेतली नाही, तर हा दर्जा काढूनही घेतला जाऊ शकतो, हे सरकारने लक्षात ठेवावे,’ असा सल्लाही राज यांनी दिला. सरकारने जात धर्म न पाहता या सर्व गडकिल्ल्यांवरची अनधिकृत बांधकामे तत्काळ पाडून टाकावीत, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा