Badlapur Tragic Death Incident : बदलापूरजवळील कासगावमध्ये एका मुलाचा विंचू चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. आरोग्य केंद्रात औषध उपलब्ध नसल्याने वेळेवर उपचार मिळाला नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. आरोग्य विभागाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. घटनेमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बदलापूरजवळच्या कासगावमध्ये एका शेतमजुराच्या सहा वर्षांच्या मुलाचा विंचू चावल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. नातेवाईकांनी आरोप केला आहे की, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात विंचू दंशावरील औषधं उपलब्ध नव्हती. त्यामुळे मुलाला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा जीव गेला.
BIG BREAKING : बदलापुरात भाजप आमदार किसन कथोरे यांच्या बंगल्याबाहेर गोळीबारकासगावच्या एका आदिवासी पाड्यात ही घटना घडली. सहा वर्षांचा मुलगा शाळेच्या आवारात खेळत होता. तेव्हा त्याला विंचू चावला. त्याला काहीतरी चावल्यासारखे वाटले आणि तो चक्कर येऊन खाली पडला. त्याच्या मित्रांनी त्याला घरी नेऊन सोडले. त्याच्या आई-वडिलांनी त्याला लगेच गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.
मुलाच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की, आरोग्य केंद्रामध्ये विषारी दंशावरील इंजेक्शन उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्यांनी त्याला बदलापूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण डॉक्टरांना त्याचा जीव वाचवता आला नाही.
Nanded News : सासरवाडीहून येताना जावयाचा भीषण अपघात, डॉक्टरांकडून Brain Death घोषित, कुटुंबाच्या एका निर्णयाने अमरत्वया घटनेनंतर तालुका आरोग्य अधिकारी अर्चना मोहिते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “कासगाव आणि वांगणी या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विषारी दंशावर उपचार करण्याची सोय आहे. मात्र, मुलाचे पालक प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेच नाही. त्यांनी थेट बदलापूरच्या खाजगी रुग्णालयात आणि नंतर कळव्याच्या रुग्णालयात मुलाला नेले.”
Solapur News | नीरा नदीत नातू वाहून गेल्याची दुर्घटना, आजीनं टाहो फोडला, वारकरीही थबकले
या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध असणे खूप गरजेचे आहे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने एका लहान मुलाचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
