Bank Manager dies in Bike Accident : नांदेड -नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीवरून जात असताना पाऊस सुरु झाला. हदगांव येथील कवठा शिवारात येताच त्यांचे वाहनावरुन नियंत्रण सुटले आणि रस्त्यावर थांबलेल्या दोन व्यक्तींना धडक बसली
मयत आशिष देशमुख हे मूळ वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील लिंगापूर कोतवाल येथील रहिवासी होते. दोन वर्षांपासून ते नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील निवघा बजार येथील आयडीबीआय बँकेत शाखा व्यवस्थापक पदावर कार्यरत होते.
नेमकं काय झालं?
काही दिवसांपूर्वी त्यांची लोहा तालुक्यात बदली झाली होती. ड्युटीच्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांनी तयारी केली. दरम्यान शनिवारी सुट्टीचा दिवस असल्याने सहकारी मित्रांसोबत त्यांनी बाहेर जेवायला जाण्याचा बेत आखला.
Pune Crime : तुला हॉटेलला नेतो, हवं ते देतो, पण माझ्या… पुण्यात 73 वर्षांच्या म्हाताऱ्याकडून 27 वर्षीय रिसेप्शनिस्टचा विनयभंग
कसा झाला अपघात?
नांदेड -नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीवरून जात असताना पाऊस सुरु झाला. हदगांव येथील कवठा शिवारात येताच त्यांचे वाहनावरुन नियंत्रण सुटले आणि रस्त्यावर थांबलेल्या दोन व्यक्तींना धडक बसली. डोक्याला हेल्मेट असल्याने देशमुख यांना डोक्याला मार लागला नाही, पण पाठीमागून येणाऱ्या दोन वाहनांनी त्याला चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नदीत बस कोसळली, एकाच महिन्यात २५ अपघात, आमदार अमोल जावळे अधिकाऱ्यांवर संतापले
Bhandara News : मी सूर मारतो, तू रील काढ; उडी घेताच तरुण बुडाला, मित्र acting समजून व्हिडिओ काढत राहिले, मृत्यूचा क्षण कॅमेरात कैद
विशेष म्हणजे आशिष देशमुख यांचा सोमवारी सोयरीकीचा कार्यक्रम होणार होता. दोन्ही कुटुंबीयांनी कार्यक्रमाची तयारी देखील केली होती. मयत आशिष देशमुख हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्यांना दोन बहिणी आहेत. त्यांची आई सुद्धा वृद्धापकाळामुळे आजारी आहे. संसाराचे सुख पाहण्यापूर्वीच आणि विवाह बंधनात अडकण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यामुळे देशमुख कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.

