Holiday For Schools In Palghar : पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवार, ७ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातील उर्दू शाळांना मोहरमनिमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवार, ७ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातील उर्दू शाळांना मोहरमनिमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परीक्षा किंवा इतर महत्त्वाचे कामकाज नसल्यास उर्दू शाळांना सुट्टी असेल. ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये शिक्षण विभागाने याबाबत स्वतंत्र आदेश जारी करून केवळ उर्दू शाळांना मोहरमच्या सुट्टीची सवलत दिली आहे. शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघर वगळता मुंबईतील शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील.
Mumbai Crime : समलिंगी संबंधांचा थरारक शेवट, मुंबईत 19 वर्षीय तरुणाने 16 वर्षीय एक्स-बॉयफ्रेण्डला संपवलं, बेडवरच…
येत्या काही तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही. मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी सांगितले की, “आवश्यकता भासल्यास त्या त्या परिसरातील शाळांना सुट्टीची सवलत दिली जाईल.” पालघर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थांना सोमवार, दिनांक ७ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
दुर्दैवी! ‘तू घरी जा, मी नंतर येतो!’ पत्नीला घरी पाठवलं; पण काळाने शेतमजुराची वाट अडवली, रस्त्यात नको ते घडलं
यादरम्यान, शिक्षण संस्थांच्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे काम करावे, असे आदेशही देण्यात आले आहेत. दहावीच्या पुरवणी परीक्षेचा भूगोल विषयाचा पेपर सोमवार, दिनांक ७ ऑगस्ट रोजी पालघर तसेच इतर सर्व जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांवर वेळापत्रकानुसार होणार आहे. मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी ही माहिती दिली.”दहावीच्या पुरवणी परीक्षेचा भूगोल विषयाचा सोमवारी(७ जुलै) हाेणारा अखेरचा पेपर पालघर तसेच इतर सर्व जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांवर वेळापत्रकानुसार हाेणार आहे,” असे राजेंद्र अहिरे म्हणाले.

