• Thu. Mar 12th, 2026

    काकाने १६ वर्षीय पुतण्याला निर्घृणपणे संपवलं, कोल्ड्रिंकमधून दिलं विष, कारण ऐकून हादराल!

    काकाने १६ वर्षीय पुतण्याला निर्घृणपणे संपवलं, कोल्ड्रिंकमधून दिलं विष, कारण ऐकून हादराल!

    Mumbai Crime: रागावलेल्या काकाने १६ वर्षीय पुतण्याची शीतपेयातून विष देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना गोवंडी शिवाजीनगर परिसरात घडली आहे.

    cold drink (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    मुंबई : आपल्यासोबत बोलत नाही आणि भेटायला येत नाही, यामुळे रागावलेल्या काकाने १६ वर्षीय पुतण्याची शीतपेयातून विष देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना गोवंडी शिवाजीनगर परिसरात घडली आहे. मृत मुलाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी काकाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

    शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नौशाद शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते कुटुंबासह गोवंडी परिसरात राहतात. त्यांचा सख्खा चुलत भाऊ जिशान हादेखील याच परिसरात भाड्याने राहतो. तो मुलगा शाहिदला घेऊन वारंवार कुठेतरी जात असल्याने, तसेच त्याची वर्तणूक चांगली नसल्याने नौशाद यांनी शाहिदला त्याला भेटण्यास मनाई केली होती. मात्र, २९ जूनला शाहिद मित्रांसोबत गप्पा मारत असताना जिशान तेथे आला आणि त्याला जबरदस्तीने सोबत घेऊन गेला. जिशानसोबत असताना शाहिद बेशुद्धावस्थेत सापडला. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
    Sunil Tatkare: घोडा मैदान जवळ, निवडणुकीत ताकद कोणाची ते दिसेलच; सुनील तटकरेंचा ठाकरे बंधूंना टोला
    शाहिदच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिशानने त्याला शीतपेय प्यायला दिले. ते प्यायल्यानंतर त्याला उलटी झाली व नंतर तो बेशुद्ध पडला. यावरून जिशानने शीतपेयातून विष देऊन शाहिदला मारल्याचा नौशाद यांचा आरोप आहे.
    Thackeray Reunion: ‘व्होटबँके’चे गणित चुकणार? ठाकरे बंधूंच्या एकीने इतर पक्षांच्या मतांवर परिणामाची चर्चा
    तस्करीदरम्यान वन्यप्राण्यांचा मृत्यू
    मुंबई :
    मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी एका प्रवाशाकडून रॅकून, ब्लॅक फॉक्स खार आणि इगुआनासह ४५ वन्यप्राणी जप्त केले. या तस्करीदरम्यान काही प्राण्यांचा गुदमरून मृत्यू झाला. थाई एअरवेजच्या विमानाने हा प्रवासी पहाटे शहरात पोहोचल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. रेस्क्यू असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअरच्या (आरएडब्ल्यू) तज्ज्ञांनी या प्राण्यांची सुटका करण्यासाठी मदत केली. जिवंत प्राण्यांना त्यांच्या मूळ देशात पाठवण्यात येणार आहे. मात्र तस्करीदरम्यान अशा पद्धतीने प्राणी मृतावस्थेत आढळतात, हा अशा प्रकारे प्राणी पाळण्याबद्दलच्या प्रेमाची अत्यंत दुर्दैवी बाजू असल्याचे ‘आरएडब्ल्यू’तर्फे सांगण्यात आले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा