Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava: सकाळी १० वाजता वरळी डोममध्ये हा मेळावा पार पडणार असून त्यासाठी जागोजागी बॅनरबाजी करण्यात आली. ‘आवाज मराठीचा’ या भावनिक संदेशासह ठाकरे बंधूंनी जनतेला या मेळाव्याचे निमंत्रण दिले आहे.
या विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू कार्यकर्त्यांना काय आदेश देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र या आदेशापूर्वीच अनेक कार्यकर्ते, संस्थांनी बॅनरबाजी केलेली दिसली. ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली. आणखी एका बॅनरद्वारे तर ‘महाराष्ट्रात मराठी मराठीसाठी ठाकरेच! सभा झाल्यावर फक्त आदेश द्या, कोणकोणत्या मराठी, महाराष्ट्रद्रोही लोकांना सरळ करायचे आहे? आम्ही आदेशाची वाट पाहत आहोत,’ असा इशारा देण्यात आला आहे.
Shivsena UBT: महिनाभरात ठाकरे गड नेस्तनाबूत! नाशकात उरले अवघे चार नगरसेवक; 31 जणांची सोडचिठ्ठी
‘ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हा!’ आणि ‘ब्रँड मराठीचा’ असा मजकूर असलेले बॅनरही वरळी परिसरात झळकले आहेत. या बॅनरमध्ये राज आणि उद्धव ठाकरे गळाभेट घेताना, बाळासाहेब ठाकरे त्यांना आशीर्वाद देताना दाखवले आहेत. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, तसेच दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते, खासदार-आमदार यांचीही छायाचित्रे लावण्यात आली आहेत.
Sand Transport: वाळू वाहतुकीस आता २४ तास परवानगी; महसूलमंत्री बावनकुळेंची विधानसभेत घोषणा
दरम्यान, या मेळाव्याच्या तयारीचा आढावा माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी घेतला. पेडणेकर यांनी व्यासपीठ, एलईडी लाइट, एलईडी स्क्रीन, कार्यकर्त्यांची आसन व्यवस्था, पार्किंग व्यवस्थेची पाहणी केली. ‘एक समुद्र समोर आहे आणि उद्या शिवसेनेचा इतिहास असणारा वरळी डोम दुसरा मानवी समुद्र पाहणार आहे,’ असे पेडणेकर म्हणाल्या.
काँग्रेस नेते अनुपस्थित राहण्याची शक्यता
या मेळाव्यासाठी सर्वपक्षीयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केले असले, तरी काँग्रेस, तसेच वंचित बहुजन आघाडी या विजयी मेळाव्याला अनुपस्थित राहणार असल्याचे समजते. काँग्रेसमध्ये या मेळाव्याबाबत ऐन वेळी नाराजी पसरल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे बंधूंनी काँग्रेसला या मेळाव्यासाठी अद्याप कोणतेही अधिकृत निमंत्रण दिलेले नाही. त्यामुळे काँग्रेसकडून कोणताही प्रतिनिधी या मेळाव्यास उपस्थित राहणार नसल्याचे समजते. मेळाव्याला मी किंवा वंचित बहुजन आघाडीचा प्रतिनिधी उपस्थित राहणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! खरिपाच्या ‘या’ 13 पिकांना विमाकवच लागू; 70 टक्के जोखीम स्तर; 31 जुलैपर्यंत मुदत
मराठी माणसाच्या हिताचाच निर्णय घेऊः फडणवीस
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘आमच्या निर्णयाचा त्यांना विशेष आनंद झालेला दिसत आहे. पण याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री असताना घेतला होता. आता विजयी मेळावा घेणारेही तेच आहेत. मराठी माणसाला कोण दुटप्पी आहे, हे लक्षात येते. आम्ही समिती नेमली आहे. मराठी माणसाच्या हिताचाच निर्णय आम्ही मान्य करू. कोणाचा दबाव मान्य करणार नाही,’ असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

