• Sat. Mar 14th, 2026

    जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो, मुख्यमंत्र्यांनी त्याचं…; मुंडेंबद्दल हे काय बोलल्या अंजली दमानिया

    जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो, मुख्यमंत्र्यांनी त्याचं…; मुंडेंबद्दल हे काय बोलल्या अंजली दमानिया

    NCP Dhananjay Munde: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महिला अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीचे म्हणणे ऐकून मुख्यमंत्री तातडीने निर्णय घेतात, असा त्यांचा आरोप आहे. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर दमानिया यांनी ही टीका केली.

    मुंबई: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महिला अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीचे म्हणणे ऐकून मुख्यमंत्री तातडीने निर्णय घेतात, असा आरोप त्यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्‍यांच्या घेतलेल्या भेटीवर बोलताना दमानिया यांनी ही टीका केली आहे.

    बीडमधील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थिनींसोबत गैरवर्तण झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्‍यांची भेट घेत या प्रकरणात एसआयटी नेमण्याची मागणी केली होती. तसंच या प्रकरणातील आरोपीचे राजकीय धागेदोरे शोधण्याची मागणी करत मुंडे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. धनंजय मुंडे यांनी दिलेल्या निवेदनानंतर मुख्यमंत्र्‍यांनी काल एसआयटीची घोषणा केली. यावरूनच आता दमानिया यांनी निशाणा साधला आहे.

    अंजली दमानिया म्हणाल्या, “जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो, ज्याच्यावर महिला अत्याचाराच्या केसेस आहेत, त्याचे म्हणणे मुख्यमंत्री ऐकून एका दिवसात SIT लावतात? काल धनंजय मुंडेंना बीडच्या अल्पवयीन मुलीवर भाष्य करताना बघून खूप राग आला. बीडच्या त्या अल्पवयीन मुलीला तातडीने न्याय मिळालाच पाहिजे, पण त्यासाठी लढायला चांगली सुसंस्कृत माणसं आहेत. आम्ही नेहमी प्रमाणे लढूच. यावर बोलण्याचा हक्क धनंजय मुंडेंना नक्कीच नाही,” असा हल्लाबोल दमानिया यांनी केला आहे.

    दमानिया यांनी एका जुन्या घटनेचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, “वैष्णवीच्या केसमध्ये मी तिच्या आईवडिलांना घेऊन वर्षा बंगल्यावर गेले तेव्हा एक महिन्याने फ़ास्ट ट्रॅकवर केस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. ही केस मुख्यमंत्र्यांनी का तत्काळ फ़ास्ट ट्रॅकवर नेली नाही?”

    दरम्यान, दुपारी २ वाजता विधान भवनात नीलम गोऱ्हे यांची भेट घेणार असल्याचंही अंजली दमानिया यांनी सांगितलं आहे. बीडच्या अल्पवयीन मुलीला तातडीने न्याय मिळायला हवा, असे त्या म्हणाल्या.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय. यापूर्वी लोकमत आणि न्यूज १८ लोकमत या संस्थांमध्येही कामाचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed