Ratnagiri Woman Fell From Bhagavati Fort: रत्नागिरीच्या भगवती किल्ल्यावरुन पडून एका तरुणीचा मृत्यू झाला होता. तिने स्वत:चं जीवन संपवलं की तिचा अपघात झाला याबाबत सध्या पोलीस तपास करत आहेत.
मृत्यू झालेली ही युवती नाशिक परिसरातील असावी असा प्राथमिक अंदाज आहे. नाशिक येथे एक युवती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासास समोर आली आहे. मात्र, या सगळ्या माहितीवरून पोलिसांनी मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याचा पंचनामा करताना या मृतदेहाच्या अंगावर परिधान असलेले कपडे, अन्य काही ओळख, त्या बँक कर्मचाऱ्याने पोलिसांना दिलेली माहिती, नातेवाईकांकडून मिळालेली माहिती या सगळ्याची खातरजमा पडताळणी केल्यानंतरच ही मृत्यू झालेली युवती नेमकी कोण या संबंधी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
अंदाजे पंचवीस ते तीस वयाच्या दरम्यान असलेली ही युवती रत्नागिरीत नेमकी कशासाठी आली? कोणाला भेटण्यासाठी आली? आदी काही प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. रत्नागिरी शहरातील भगवती किल्ल्यावरून एका युवतीने आपला जीव दिला असावा किंवा मोबाईल वरून सेल्फी काढताना तिचा तोल गेला असावा त्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
Ratnagiri News: आली, बसली अन् काहीच वेळात तरुणीची भगवती किल्ल्यावरुन उडी, रत्नागिरीच्या समुद्रात बॉडी अन्…
रविवारी सकाळच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला होता. या सगळ्या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह रत्नागिरीचे प्रांताधिकारी, तहसीलदार, सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन या परिसरातील सुरक्षा उपयोजना याबाबतही बाबतही सूचना दिल्या होत्या. या युवतीची ओळख होण्यासाठी पोलीस व सुरक्षा यंत्रणांनी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले होते. ही युवती या किल्ल्याकडे जाताना एका व्यक्तीने पाहिले होते व ती पाय पसरून बसल्याचेही दिसलं होतं. मात्र, त्यानंतर ही युवती अचानक दिसेनाशी झाली व काही वेळाने समुद्रात तिचा मृतदेह तरंगताना दिसला. याची खबर तात्काळ येथील उपस्थित असलेल्या एका पर्यटकाने पोलिसांना दिली होती. मात्र, तिने उडी घेतली की सेल्फी काढताना पडली याबाबत संभ्रम कायम आहे.
मृत युवतीची ओळख पटवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश माईनकर, रत्नागिरी शहराचे पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्याकडून याबाबतचा तपास सुरू असून लवकरच या प्रकरणात काही माहिती हाती येण्याची शक्यता आहे. अधिक तपास रत्नागिरी पोलीस तपास करत आहेत.

