• Wed. Mar 11th, 2026
    हिंदी सक्तीचे GR रद्द होताच राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, उशिरा..

    शालेय शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्तीच्या निर्णयाला विरोध झाला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत मोर्चा काढण्याची तयारी केली. या विरोधानंतर सरकारने निर्णय बदलला. हिंदी भाषा सक्तीचे शासन निर्णय रद्द केले. राज ठाकरे यांनी या निर्णयाचे स्वागत केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या विरोधात आवाज उठवला होता.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : राज्यातील शालेय शिक्षणात त्रिभाषा सूत्रानुसार पहिलीपासून हिंदीच्या अंमलबजावणीला सुरूवात करण्यात आली होती. तसे आदेश काढण्यात आले. हिंदी भाषेची शालेय शिक्षणापासूनच सक्ती करण्यात आली. मात्र, या निर्णयाला जोरदार विरोध करण्यात आला. राज ठाकरे सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात मैदानात उतरले. सरकारच्या या निर्णयाविरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, त्यापूर्वी होणारा विरोध पाहून सरकारने आता निर्णय बदलला आहे. हिंदी भाषा सक्तीचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आली आहेत.

    सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलीये. राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, “इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील 2 जीआर रद्द केले. याला उशिरा आलेले शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे मात्र अजून गूढच आहे.
    सर्वात मोठी बातमी! हिंदी भाषा सक्तीचे दोन्ही शासन निर्णय रद्द, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणापण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हाणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल 2025 पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेंव्हापासून हा मुद्दा तापायला लागला. त्यानंतर एक एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायच्या ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली. हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी. कदाचित या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल, पण हरकत नाही ही भीती असली पाहिजे.

    अजून एक गोष्ट, सरकारने पुन्हा एकदा नवीन समिती नेमली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतोय समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे परंतू हे असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत! ही गोष्ट सरकारने कायमची त्यांच्या मनात कोरून ठेवावी. हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे असं आम्ही गृहीत धरतोय आणि महाराष्ट्रातील जनतेने पण हेच गृहीत धरलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका, अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी.

    हिंदी सक्तीचे GR रद्द होताच राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, उशिरा आलेले शहाणपण म्हणता येणार नाही, कारण…

    आता मराठी माणसाने पण यातून बोध घ्यायला हवा. तुमच्या अस्तित्वाला, तुमच्या भाषेला नख लावायला आपलेच लोकं बसलेत आणि त्यांच्यासाठी ते ज्या भाषेत शिकले, वाढले, जी भाषा त्यांची ओळख आहे त्याच्याशी काही देणंघेणं नाहीये… त्यांना कोणालातरी खुश करायचं आहे बहुदा. यावेळेस मराठी मनांचा एकत्रित राग दिसला तो पुन्हा पुन्हा दिसला पाहिजे. असो, पण भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली हा आनंद आहे. हा कडवटपणा अधिक वृद्धिंगत होऊ दे, आणि मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा होऊ दे हीच इच्छा, मराठी जनांचं पुन्हा एकदा अभिनंदन, असे राज ठाकरे यांनी म्हटले. सरकारच्या निर्णयानंतर संजय राऊत यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे हिंदीसक्ती विरोधात एकत्र मोर्चा काढणार होते.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा