Navi Mumbai Airport: येत्या १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवी मुंबईतून विमानोड्डाणाला सुरुवात करण्याचा राज्य सरकार व अदानी समूहाचा मानस असल्याचे बोलले जात आहे.
येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतून विमानोड्डाण करण्याचे सिडको व राज्य सरकारचा प्रयत्न होता. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाच्या कामाच्या आढावा बैठकीसाठी विमानतळ साईटवर आलेल्या राज्यातील आमदारांच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या (पीयूसी) शिष्टमंडळासमोर प्रकल्पाचे सादरीकरण करताना नवी मुंबईतून विमानोड्डाणाचा मुहूर्त आता येत्या सप्टेंबर महिन्यातला ठरवला जाणार आहे. नवी मुंबई विमानतळ टर्मिनल येथे तब्बल १३ हजार कामगार विमानतळ प्रकल्पस्थळी काम करत आहेत. त्यामुळे फक्त देशांतर्गत (डोमेस्टिक) विमान उडवण्याऐवजी परदेशांतर्गत (इंटरनॅशनल) विमानसेवाही एकाच वेळेस सुरू करण्याचा मानस अदानी समूह व केंद्र सरकारच्या स्तरावर घेतला गेल्याचे बोलले जात आहे.
पुढील दोन दिवस महत्त्वाचे! मुंबई, पुणे, दक्षिण कोकणसह राज्याच्या ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, IMDचा ॲलर्ट
यापूर्वी मे २०२५ व जून २०२५ मध्ये नवी मुंबईतून विमानोड्डाण करण्याचा मुहूर्त काढण्यात आला होता. परंतु, टर्मिनलचे काम पूर्ण न झाल्याने १५ ऑगस्टचा मुहूर्त काढण्यात आला. मात्र टर्मिनलचे काम पूर्णत्वास जाण्यासाठी किमान १५ सप्टेंबर उजाडणार असल्याचे अदानी समूहातर्फे सार्वजनिक उपक्रम समितीच्या आढावा बैठकीत सांगण्यात आले.
मुंबईकरांचे ‘मेगा’हाल! मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर उद्या ब्लॉक, Timetable बघूनच घराबाहेर पडा
प्रतिवर्ष नऊ कोटी प्रवासीक्षमता
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची एकूण क्षमता प्रतिवर्ष नऊ कोटी प्रवासी आणि ३०.२ लाख टन मालवाहतुकीची असणार आहे. पहिल्या टप्प्यातील क्षमता दोन कोटी प्रवासी व आठ लाख टन मालवाहतुकीची असून, यामध्ये कोड-इ धावपट्टी, दोन समांतर टॅक्सी-वे, टी-१ टर्मिनल, कार्गो टर्मिनल व अन्य पूरक सुविधा समाविष्ट आहेत.

