• Sat. Mar 7th, 2026

    ‘राज ठाकरेंनी शिक्षणमंत्र्यांना स्कोअरिंग सब्जेक्ट’ म्हणून दोन खेळांचे पर्याय दिलेले’; अविनाश जाधवांकडून गौप्यस्फोट

    ‘राज ठाकरेंनी शिक्षणमंत्र्यांना स्कोअरिंग सब्जेक्ट’ म्हणून दोन खेळांचे पर्याय दिलेले’; अविनाश जाधवांकडून गौप्यस्फोट

    Avinash Jadhav Marathi News : हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र आले असून 5 जुलैला मुंबईत मोर्चा काढणार आहेत. राज ठाकरे यांनी शिक्षणमंत्र्यांसोबतच्या बैठकीत’स्कोअरिंग सब्जेक्ट’ म्हणून दोन खेळांचे पर्याय दिल्याची माहिती अविनाश जाधव यांनी दिली. कोणते खेळ होते ते जाणून घ्या.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रदिप भणगे, ठाणे : हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र एक झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणातही ठाकरेंनी एकत्र यावं असं म्हटलं जात होतं. राजकारणात एकत्र येण्याबाबत अद्याप काही ठरलं नसलं तरी मराठीसाठी दोन्ही बंधू एकत्र आले आहेत. येत्या 5 जुलैला मुंबईमध्ये हिंदी सक्तीविरोधात मोर्चा निघणार आहे. यावेळी दोन्ही भावांची वज्रमूठ एक होणार असल्याने दोघांची ताकदीचा एक नमुना दिसणार आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरेंसोबत बैठक घेतली होती. यामध्ये ठाकरेंनी ‘स्कोअरिंग सब्जेक्ट’ म्हणून दोन खेळांचे पर्याय सरकारसमोर मांडले होते. यासंदर्भात मनसे नेते अविनाश जाधव यांनी माहिती दिली आहे.

    शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी तबला आणि स्विमिंग यांसारख्या विषयांना ‘स्कोअरिंग सब्जेक्ट’ म्हणून मान्यता देण्याचा विचार मांडला होता. मग हिंदी भाषेलाच का प्राधान्य दिले जात आहे? असा सवाल ठाकरेंनी विचारला असल्याचं अविनाश जाधव यांनी सांगितलं. आम्हाला अशा कला क्षेत्रातली एखादी भाषा द्या. हिंदी का..? तुम्ही या सर्व गोष्टी करून हिंदी लादण्याचा प्रयत्न करत आहात. मनसे मराठी भाषेच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे आणि या दिशेने आवश्यक ती पाऊले उचलण्यास तयार आहे, असल्याचंही अविनाश जाधव म्हणाले.
    Maharahstra Politics : हिंदीसक्ती विरोधात भाजपमध्ये नाराजी? पहिला राजीनामा पडला, मनसेचा दावा, राज ठाकरेंना पाठिंबा

    राज ठाकरे राऊतांना काय म्हणाले?

    राज ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना फोन केला. मराठी माणसाच्या हितासाठी दोन मोर्चे काढण्याऐवजी एकच मोठा मोर्चा काढण्याचा विचार त्यांनी मांडला. या मोर्चाच्या माध्यमातून मराठी माणसाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार आहे. यापूर्वी महाराष्ट्रात असा भव्य मोर्चा कधीही झाला नव्हता, असे जाधव यांनी सांगितले. अनेक कलाकार आणि साहित्यिकांनी 5 तारखेच्या मोर्चात सहभागी होण्याची इच्छा दर्शवली आहे. या मोर्चाच्या आयोजनामागे कोणतीही राजकीय भूमिका नाही, तर मराठी भाषेचा आदर जपण्याचा उद्देश असल्याचं जाधव म्हणाले.
    Three Language Policy : तिसऱ्या भाषेचे शिक्षण मौखिक, शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा; पहिली, दुसरीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याची घाई?
    जाधव यांनी सांगितले की, त्यांचे चौथीमध्ये शिकणारे मुलगा मराठी आणि हिंदी भाषा एकत्र करून बोलतो. अनेक मुलांसोबत असे घडत आहे. लहान मुले बोलताना पहिले वाक्य मराठीत आणि दुसरे वाक्य हिंदीत बोलतात. त्यामुळे त्यांच्या मेंदूवर परिणाम होत आहे, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. या सरकारला हे समजत नाही. त्यांना दिल्लीतील मनसुबे टिकवायचे आहेत. त्यामुळे हे सर्व सुरू आहे. मनसे आणि इतर पक्ष याला विरोध करतील. मोर्चा ही फक्त पहिली पायरी आहे. यानंतर होणाऱ्या विरोधाला सामोरे जाण्याची तयारी सरकारने ठेवावी, असा इशारा जाधव यांनी दिला.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा