• Sat. Mar 7th, 2026
    विदर्भात मुसळधार पाऊस! बुलढाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांत पूरस्थिती, अनेक मार्ग झाले ठप्प

    Vidarbha Rain Update: वाघाडी नदीला पूर आल्याने घाटंजीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उघड्यावर आले. शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट मात्र टळले आहे.

    विदर्भ पाऊस (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: विदर्भात बुधवारी सायंकाळपासून सुरू झालेली कोसळधार गुरुवारी रात्री उशिरापर्यंत कायम राहिल्याने बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात नदी, नाल्यांना पूर आला. मेहकर व लोणार तालुक्यात हाहाकार उडाला.

    कांचनगंगा नदीला पूर आल्याने मुंबई-नागपूर महामार्ग बंद पडला. वाशीम जिल्ह्यात कुकसा फाट्याजवळील नदीला पूर आल्याने जुना संभाजीनगर-नागपूर, किनिराजा-वाशीम आणि मेडशी-भैरद मार्गावरील वाहतूक थांबली होती. यवतमाळातील घाटंजी-येरंडगाव आणि वर्धा-राळेगाव मार्गही पुरामुळे बंद करण्यात आला होता. वाघाडी नदीला पूर आल्याने घाटंजीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उघड्यावर आले. शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट मात्र टळले आहे.
    Shaktipeeth Mahamarg: शक्तिपीठमुळे मविआला बळ! महामार्गाला तीनही पक्ष एकत्रित विरोध करणार
    बुलढाण्यासह मेहकर, चिखली तालुक्यांतील २३ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मेहकर तालुक्यातील डोणगाव भागात सलग १९ तासांपासून पाऊस पडत होता. डोणगावमधील अंधारवाडी भागात पाचशेवर नागरिकांना हलविण्यात आले. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरून घरांतील साहित्याचे नुकसान झाले.

    मेहकरजवळ समृद्धी महामार्गावरील इंटरचेंजवरूनदेखील नदीच्या पात्रासारखे पाणी वाहू लागले. महामार्गाच्या पुलाखालूनही पाणी वाहू लागल्याने मेहकर-खामगाव महामार्ग ठप्प झाला होता.

    डोणगाव येथील काही शेतकरी पुरात अडकले. झाडावर चढून त्यांनी आपला जीव वाचविला. एनडीआरएफच्या पथकाने या सर्वांना सुखरूप बाहेर काढले.
    लाडक्या बहिणी विमा वंचित; रेशनकार्डवर नाव नसल्याने प्रसूतीवेळी लाभ नाही
    मुंबई-नागपूर महामार्गावरील वाहतूक कांचनगंगा नदीच्या पुराने ठप्प. नदीपासून पाचशे मीटर अंतरापर्यंत पुराचे पाणी. पूर ओसरण्याची वाट पाहणारे कारमधील लोक वाहनातच बसून होते. मात्र, रस्त्यावर पाणी वाढल्याने कार तेथेच सोडून लोक जीव वाचवून पळाले.

    वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील डिगडोह येथे यशोदा नदीला पूर. वर्धा-राळेगाव मार्ग बंद. आलमडोह गावात पुराचे पाणी शिरले.

    यवतमाळातील घाटंजी तालुक्यात २४ तासात १२९ मिमी पाऊस. नदी, नाल्यांना पूर आल्याने वाहतूक ठप्प. घाटंजी-येरंडगाव मार्ग बंद. वाघाडी नदीला पूर आल्याने अनेक घरांत पाणी शिरले.
    Ashadhi Wari 2025: चला चला पंढरीला! आषाढीनिमित्त नाशिक जिल्ह्यातून धावणार 300 जादा बसेस, असे आहे नियोजन
    झरी-जामणी तालुक्यातील गणेशपूर शिवारातील कारखान्याचे शेड कोसळल्याने महिला कामगाराचा दबून मृत्यू; तर सात जखमी झाले.

    वीज पडून दोन भावंडांचा मृत्यू
    वर्धा :
    शेतात पेरणी करीत असताना पावसाला सुरुवात झाल्याने बचावासाठी झाडाखाली थांबले; पण याच झाडावर वीज कोसळल्याने दोन भावंडांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास कारंजा घाडगे शेतशिवारात घडली. रितेश मोरेश्वर सरोदे (२२) व राजेश ताराचंद सरोदे (१६) रा. खर्डीपुरा अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही चुलत भाऊ होते. मोरेश्वर सरोदे यांच्या शेतावर कापसाची पेरणी सुरू असल्याने हे दोघेही गेले होते.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed