• Fri. Mar 6th, 2026
    मुंबईतील कोरोनामुळे रुग्ण दगावले? महापालिकेने दिली मोठी अपडेट; आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

    Mumbai Covid-19 Update : आशिया खंडातील काही देशांमध्ये कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे आता साऱ्यांचीच धाकधूक वाढली आहे. मुंबईतही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समजते. मुंबईतील केईम रुग्णालयात दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त होते. मात्र दोन्ही रुग्णांचा मृत्यू कोरोनाने नाही तर इतर गंभीर आजारामुळे झाल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : आशिया खंडातील काही देशांमध्ये कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे आता साऱ्यांचीच धाकधूक वाढली आहे. मुंबईतही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समजते. मुंबईतील केईम रुग्णालयात दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त होते. दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. परंतु या दोन्ही रुग्णांचा मृत्यू कोरोनाने नाही तर इतर गंभीर आजारामुळे झाल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. कोविड-१९ चा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य खाते अलर्ट मोडवर आले आहे.

    आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ ते एप्रिल २०२५ पर्यंत कोविड रुग्णांची संख्येत वाढ झालेली नाही. परंतु मे महिन्यापासून काही रुग्ण आढळून आले आहेत. याबाबत नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

    प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले की, मुंबईत ८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याबाबत अधिकृत माहिती समोर आली नव्हती. आता महानगरपालिका प्रशासनाने याबाबत स्पष्टता केली आहे. राजे एडवर्ड स्मारक (के. ई.एम) रुग्णालयात कोविड बाधित महिला (वय 14 वर्षे) आणि महिला (वय ५४ वर्षे) या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतु हे मृत्यू कोविडमुळे नसून अनेक गंभीर आजारांमुळे (Nephrotic cyndrome with Hypocalcemic seizures) मुळे झाले आहेत, असे रूग्णालय तज्ज्ञांच्या तपासणीत स्पष्ट झाले.

    २०२० ते २०२२ च्या दरम्यान भारतात कोविड-१९ आजाराने धु्माकूळ घातला होता. ज्यामुळे जीवनमान ठप्प झाले होते. हा आजार निरंतर चालणारी आरोग्य समस्या म्हणून गणली जाते. कोरोना विषाणू आता विशिष्ट पातळीवर स्थिरावला असून रुग्णांची संख्या नाममात्र आहे. पण केईम रुग्णालयातील दोन रुग्णांच्या मृत्यूमुळे चिंतेत भर पडली होती. तरी नागरिकांनी खबरदारी बाळगावी असे आवाहन करण्यात येत आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed