Sanjay Shirsat News : संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात बाळासाहेब ठाकरे यांनी अमित शहांना कसं वाचवलं आणि शरद पवारांनी नरेंद्र मोदींची अटक कशी टाळली, याचे गौप्यस्फोट आहेत. यावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले, राऊतांनी पुस्तकात वास्तविकता मांडावी. शिवसेनाप्रमुखांमुळे अनेकजण मोठे झाले, पण त्यांनी कधीही ते दाखवले नाही. राऊतांचे पुस्तक चित्रपटाच्या स्क्रिप्टसारखे आहे.
संजय राऊतांनी पुस्तक लिहिले, त्यांना लिहायचं छंद आहे ही चांगली गोष्ट आहे. पण त्यात वास्तविकता मांडायला पाहिजी होती. शिवसेना प्रमुखामुळे अनेकांना मदत झाली आहे हे सर्वमान्य आहे. मात्र त्यांनी कधीही दाखवलेले नाही. संजय राऊत यांचे पुस्तक चित्रपटाच्या स्क्रिप्ट सारखी, (खिल्ली उडवत) विमानतळावर आले, मातोश्रीवर आले, घामाघूम झाले हे चित्रपटासारखं स्क्रिप्ट लिहिली. हा काय टॅक्सीचा पाठलाग करीत होता की मग मातोश्रीचे वॉचमन होता? असं संजय शिरसाट म्हणाले.
Sanjay Raut : ‘शरद पवारांच्या ‘त्या’ एका मुद्द्यावर नरेंद्र मोदींची अटक टळली’, संजय राऊतांनी पुस्तकामध्ये सर्व काही सांगितलं
मोदी आणि शाह यांचं गुजरातमध्ये मोठ प्रस्त होतं, ती साधारण माणसं नव्हती. त्यांनी बाळासाहेबांना फोन करून वेळ घेतली असेल. शरद पवार यांचे मुद्दाम नाव घेतले. मोदी गेले तर भाजप जाईल, गुजरात जाईल हे शिवसेना प्रमुखांनी सांगितले होते. शिवसेना प्रमुख बेधडक बोलणारे नेते. त्यावेळी तुम्ही कुठे होता, काय करत होता. काहीतरी गौप्यस्फोट म्हणून हे पुस्तक लिहिलं आहे. यांच्यामुळे शिवसेनाप्रमुख मोठे झालेले नाहीत, असंही शिरसाटांनी म्हटलं आहे.
Sanjay Raut : ‘राजा का संदेश साफ है, अमित शाहांना बाळासाहेबांनी एका फोनवर कसं वाचवलं? संजय राऊतांच्या पुस्तकात खळबळजनक खुलासा
राजकारणात अशा गोष्टी सांगून केल्या जात नाही. शरद पवार हे स्वतः बोलले तर त्याला महत्व आहे. हे का दलाली करतात.शरद पवार हजारवेळी मातोश्रीवर जायचे, हे स्वतः शिवसेनाप्रमुखांनी सांगितले. मुंबईत शिवसेना वाढायला कोण कारणीभूत हे कुणी सांगितले का? गुजरात दंगल आणि गोध्रा हत्याकांड का घडलं. त्यावेळी शिवसेना प्रमुख काय बोलले होते आठवत का? त्याकाळी का संपूर्ण हिंदू समाज मोदींच्या बाजूने होता. मोदी शहा यांनी काही चोरी केली नव्हती. त्यावेळी शिवसेना प्रमुख खंबीरपणे मोदी आणि शाह यांच्या मागे उभे असल्याचंही शिरसाटांनी सांगितलं.

