शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का? अशी शंका वेळोवेळी उपस्थित केल्या जात असताना आता पुन्हा एकदा चर्चांना उधान आलंय.दरम्यान यावर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष भास्कर आंबेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येणार नाहीत, असं मला वाटतं. अजित पवार आणि शरद पवार एकत्र आल्याने आमच्यावर काही फरक पडणार नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर नक्कीच ताकद वाढेल. महापालिका निवडणुका कधीही झाल्या तरी ठाकरे गटाला नक्की यश मिळेल. जालना जिल्ह्यात महापौर कुणाचा? यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.