Maharashtra Weather Forecast : पुढील पाच दिवसात राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस हजेरी लावणार आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक सह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
पुढील पाच राज्यात पाऊस
विदर्भात एकीकडे पाऊस तर काही शहरांमध्ये तापमानाचा नवा उच्चांक पाहायला मिळाला. यंदा मॉन्सून लवकरच येणार असल्याचे संकेत असून आता हवामान खात्याने मोठा अंदाज वर्तवला आहे. राज्यात पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हा देण्यात आलाय. राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे. यावेळी फक्त विदर्भ आणि मराठवाडाच नाही तर कोकणासोबत मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस हजेरी लावणार आहे.
Pune News : तुम्ही भारतमातेची काळजी घ्या, मी तुमच्या माऊलीला बरं करतो; डॉक्टरांचा शब्द, पुण्याचा CRPF जवान देशसेवेला रवानाढगाळ वातावरणामुळे तापमानात घट
राज्यात पुढील चार दिवस पावसाची हजेरी असणार आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट होताना दिसतंय. यंदा राज्यात भर उन्हाळ्यात पाऊस येताना दिसतोय. छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, सोलापूर, धाराशिव, जालना, अकोला, वाशिम, नागपूर, गडचिरोली, गोदिंया, धुळे, आहिल्यानगर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रायगड याठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
दुसरीकडे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मॉन्सूनपूर्वीची कामेही अजून करता आली नाहीत. शिवाय पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे. यंदा राज्यात पाऊस चांगला असण्याचेही संकेत आहेत. मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होताना दिसले. काही शहरांमध्ये पारा वाढताना दिसला तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे आंब्यांचे मोठे नुकसान झाले. नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी मोठी गारपिट झाली.

