• Thu. Mar 12th, 2026
    Maharashtra Weather Update : राज्यावर संकट, पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा

    Maharashtra Weather Forecast : पुढील पाच दिवसात राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस हजेरी लावणार आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक सह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    पुणे : मागील काही दिवसांपासून राज्यात सतत हवामानात बदल होताना दिसतोय. कधी तीव्र उष्णता तर कधी मुसळधार पाऊस असे चित्र आहे. मुळात म्हणजे होळीनंतरच राज्यातील हवामान पूर्ण बदलले आहे. होळीनंतर उष्णता वाढणार असे संकेत होते. मात्र, प्रत्यक्षात पूर्ण उलटे झाले. काही महिन्यांपासून राज्यात सतत अवकाळी पाऊस हजेरी लावताना दिसला. काही भागांमध्ये तर जोरदार गारपिट झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. भर उन्हाळ्यात पाऊस सुरू असल्याचे चित्र बघायला मिळाले. काही ठिकाणी पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाताना देखील दिसला. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने झोडपून काढले.

    पुढील पाच राज्यात पाऊस

    विदर्भात एकीकडे पाऊस तर काही शहरांमध्ये तापमानाचा नवा उच्चांक पाहायला मिळाला. यंदा मॉन्सून लवकरच येणार असल्याचे संकेत असून आता हवामान खात्याने मोठा अंदाज वर्तवला आहे. राज्यात पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हा देण्यात आलाय. राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे. यावेळी फक्त विदर्भ आणि मराठवाडाच नाही तर कोकणासोबत मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस हजेरी लावणार आहे.
    Pune News : तुम्ही भारतमातेची काळजी घ्या, मी तुमच्या माऊलीला बरं करतो; डॉक्टरांचा शब्द, पुण्याचा CRPF जवान देशसेवेला रवानाढगाळ वातावरणामुळे तापमानात घट

    राज्यात पुढील चार दिवस पावसाची हजेरी असणार आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट होताना दिसतंय. यंदा राज्यात भर उन्हाळ्यात पाऊस येताना दिसतोय. छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, सोलापूर, धाराशिव, जालना, अकोला, वाशिम, नागपूर, गडचिरोली, गोदिंया, धुळे, आहिल्यानगर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रायगड याठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

    पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    दुसरीकडे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मॉन्सूनपूर्वीची कामेही अजून करता आली नाहीत. शिवाय पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे. यंदा राज्यात पाऊस चांगला असण्याचेही संकेत आहेत. मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होताना दिसले. काही शहरांमध्ये पारा वाढताना दिसला तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे आंब्यांचे मोठे नुकसान झाले. नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी मोठी गारपिट झाली.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed