• Mon. Sep 14th, 2026
खदानीच्या पाण्यात पोहायला गेला अन् तोच काळ ठरला; सौर प्रकल्प अभियंत्याचा अंत

Beed News : बीडच्या केज तालुक्यातील सौर ऊर्जा प्रकल्पावर दुर्दैवी घटना घडली आहे. सौर प्रकल्पावर कार्यरत असलेला अभियंता पोहण्यासाठी खदानीच्या पाण्यात गेला होता. त्या ठिकाणी त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

(फोटोLipi)

बीड : बीडच्या केज तालुक्यातील सौर ऊर्जा प्रकल्पावर दुर्दैवी घटना घडली आहे. सौर प्रकल्पावर कार्यरत असलेला अभियंता पोहण्यासाठी खदानीच्या पाण्यात गेला होता. त्या ठिकाणी त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सचिन गोरे असे या अभियंत्याचे नाव असून तो लातूर येथील रहिवासी आहे. एका खडी क्रेशरवर सौर ऊर्जा पॅनल बसवण्याच्या तो त्याठिकाणी गेला होता.

वृ्त्तानुसार, कानडी माळी परिसरात एका प्रायव्हेट कंपनीद्वारे सौर ऊर्जा पॅनल बसवण्याचे काम काम सुरू होते. सचिन गोरे या ठिकाणी कार्यरत होता. त्याच्यासोबत इतर ८ सहकारी देखील होते. तो त्याच्या सहकाऱ्यांसह जवळच असलेल्या एका खदानीमध्ये पोहण्यासाठी उतरला होता. परंतु यादरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने सचिन बुडू लागला. त्यांच्या सहकाऱ्यांनी आरडाओरड करून त्यांना वर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तो बुडाला. खदान खूप खोल असल्यामुळे त्याचा मृतदेह सापडला नाही.
Buldhana Accident: महाकालचं दर्शन घेऊन घराकडे निघाले, वाटेत भीषण अपघात, इस्त्रोत शास्त्रज्ञ असलेल्या मुलासह आई-वडिलांचा मृत्यू
खूप शोध घेऊनही तो मिळाला नसल्याने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी तब्बल आठ तासानंतर सचिन गोरे यांचा मृतदेह बाहेर काढला आहे. दरम्यान सैन्यात अग्निवीर म्हणून सचिनची निवड झाली होती. त्याचे प्रशिक्षणही सुरु होणार होते. मात्र त्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

जळगावमधूनही दुर्दैवी घटना समोर आली आहे. आई-वडिलांचे छत्र सर्वांना हवेसे वाटणारे असते. पण सर्वांच्याच वाटेला हे सुख येत नाही. या तरुणाची कहाणी ऐकाल तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. अजय चौधरी लहान असतानाच त्याच्या डोक्यावरील वडिलांचं छत्र हरपलं. त्याने वडिलांचं प्रेम काय असतं, त्यांचा आधार काय असतो हे अनुभवण्यापूर्वीच नियतीने त्याच्यापासून त्याचे बाबा हिरावून घेतले. त्याला त्याच्या आईनेच सांभाळ करत लहानाचं मोठं केलं. पण तिचाही आजाराने मृत्यू झाला. आता या दहा महिन्यातच अजयचाही चटका लावणारा अंत झाला आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed