खासदार कल्याण काळे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मुद्द्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शरद पवार अजित दादा एकत्र आले तर आनंदच आहे. ते दोघे एकत्र येत असतील तर त्यामध्ये कोणतेच दुमत नाही. पण शरद पवार इंडिया आघाडी सोडून जाणार नाही, असंही ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. ते म्हणाले, अर्जुन खोतकर कशाच्या आधारावरी ठरवतात की त्यांचा महापौर होईल. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महानगरपालिका एकत्रित लढू असंही म्हणाले. पण याचा निर्णय तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते ठरवतील. जालना महानगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात येईल आणि भरभरून यश मिळेल.