Former Army Chief General Manoj Naravane: युद्धातून कोणाचाही खरा विजय होत नाही. शांतता हाच खरा विजय आहे,’ असे मत माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी रविवारी व्यक्त केले.
‘दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया’च्या पुणे विभागाच्या हीरक महोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमात जनरल नरवणे (नि.) बोलत होते. ‘किशोर पंप्स’चे व्यवस्थापकीय संचालक किशोर देसाई, इन्स्टिट्यूटचे माजी अध्यक्ष सीएमए डॉ. धनंजय जोशी, सीएमए अमित आपटे, केंद्रीय समितीचे सदस्य सीएमए नीरज जोशी, माजी सदस्य सीएमए संजय भार्गवे, पुणे शाखेचे अध्यक्ष सीएमए नीलेश भास्कर केकाण, पश्चिम विभागीय समितीचे माजी अध्यक्ष सीएमए चैतन्य मोहरीर आदी उपस्थित होते.
नागपुरात रेव्ह पार्टी उधळली; मुंबईतील चार ‘झिंगाट’ तरुणी आढळल्या, बिल्डरसह चौघांना अटक
‘संरक्षणावर उधळपट्टी नाही’
‘युद्धानंतर भारतीय लष्कर नेहमीच शांततेकडे परतते आणि तसेच राहायला हवे. संरक्षणासाठी किती खर्च करावा आणि शिक्षण, आरोग्य, स्वच्छता यांसाठी किती खर्च करावा हा वाद फार जुना आहे. संरक्षणातील खर्च ही उधळपट्टी नसून, देशासाठी आवश्यक विमा आहे. सज्ज लष्करामुळे संघर्ष टळतो आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते. युद्ध महागडे असते, त्याची नुकसानभरपाई खर्चिक असते; म्हणून ही गुंतवणूक देशाच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहे,’ असे जनरल नरवणे (नि.) म्हणाले.
चाळीस मराठी शाळांना टाळे, विद्यार्थीसंख्येतही ५० हजारांची घट, सहा वर्षांतील मुंबईतील स्थिती
‘सामाजिक कार्यही करत राहा’
‘व्यवसाय नेहमी एका स्वप्नातून सुरू होतो आणि त्यातूनच पुढचा प्रवास घडतो. उद्योग करताना सामाजिक कार्यही करत राहा,’ असे देसाई म्हणाले.
‘सन १९६५मध्ये पुण्यात स्थापन झालेल्या या विभागाने आजवर ४० हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून, २,२००हून अधिक विद्यार्थी प्रमाणित कॉस्ट अकाउंटंट्स म्हणून घडवले आहेत,’ असे मोहरीर म्हणाले. नीलेश केकाण यांनी प्रास्ताविक केले.
ईडीची बीडमध्ये मोठी कारवाई; ‘ज्ञानराधा’ घोटाळाप्रकरणी तब्बल १८८ कोटींच्या मालमत्तेवर टाच
युद्ध ‘रोमान्स’नाही, चित्रपटकथाही नाही
युद्ध ही ‘रोमँटिक’ गोष्ट नाही आणि चित्रपटाची कथाही नाही. युद्धामुळे मृत्यू, निर्वासितांच्या समस्या, कुटुंबांचे विघटन असे अदृश्य; पण खोल सामाजिक नुकसानही होते. आजच्या (रविवार) मातृदिनानिमित्त युद्धामुळे कोणत्याही मातेला आपले मूल गमवावे लागू नये, असे मला वाटते,’ असे जनरल मनोज नरवणे (नि.) म्हणाले.

