• Sat. Mar 7th, 2026

    Udayanraje Bhosale : ‘हे बघून मला मानसिक त्रास होतो’, उदयनराजे स्पष्टच बोलले

    Udayanraje Bhosale : ‘हे बघून मला मानसिक त्रास होतो’, उदयनराजे स्पष्टच बोलले

    Udayanraje Bhosale on India Pakistan Tension : सोलापुरात बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी भारत-पाकिस्तान संबंधांवर भाष्य केले. फाळणी का झाली यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सीमेवर जवान शहीद होत आहेत, याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. दहशतवादी कसे निर्माण झाले, यावर विचार करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. हिंदू-मुस्लिम सलोख्याबद्दल त्यांनी विचार व्यक्त केले. सध्या जे सुरु आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित होते का? असा सवालही त्यांनी केला.

    (फोटो– Lipi)

    इरफान शेख, सोलापूर : भाजप खासदार उदयनराजे भोसेल यांनी आज भारत-पाकिस्तान तणावावर भाष्य केलं. “दोन्ही राष्ट्रांमध्ये कोणी या बाजूला राहतं तर कोणी त्या बाजूला राहतं. फाळणी का झाली माहीत नाही. त्यावेळचे नातेवाईक, कोणी फाळणी केली हे माहित नाही, त्याचं संशोधन तुम्ही करा”, असं उदयनराजे भोसले म्हणाले. “कुणाला काही दाखवायचं होतं. त्यावेळेस किती जीव गेले, लोक मरताना बघताना कित्येक जण म्हणतात ही कुठली पद्धत आहे. कुणीतरी कुणाचा मुलगा आहे, कसं वाटत असेल मला सांगा. मग जागतिक पातळीतील चर्चा घडवून आल्या तर त्या चर्चेला मी जाईन. बोललं तर सगळ्यांना वाटतं मी बोलतो. तुमचे रणगाडे, प्लेन, मिसाईल हे खपवण्याकरता तुम्ही हे करता का काय? आज किती लोकांचा जीव जातोय, आज आपण पाहतोय”, अशी भावना उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.

    “एक-एक वेळेस डोकं काम करायचं बंद होतं. बॉर्डरवर कोण असेल आपल्या कुटुंबातील कोण गेलं तर कसं वाटेल? जगात कोणीही असू द्या थोडं शांत बसून, आत्मचिंतन करून विचार केला पाहिजे की इथं काय, आपण काय करतोय? याचे उत्तर कोणीतरी दिलं पाहिजे”, असं उदयनराजे म्हणाले. “हे डोंगर जेवढे दिसत आहेत ना ते तुम्ही आम्ही निर्माण केलेले नाही. हे पहिल्यापासून आहेत. हा निसर्ग आहे. निसर्ग पेक्षा कोणी मोठे नाही. आज मला सांगा त्यावरून वाद? कमाल आहे”, अशी खंत उदयनराजे यांनी व्यक्त केलीय.

    “दहशतवादी कसे निर्माण झाले, का निर्माण झाले, तुम्ही पत्रकार आहात तुम्ही विचार करा, का निर्माण झाले? ज्याला दोन टाईम जेवण मिळत नसेल तो काय करणार? त्याला कुटुंबाची काळजी घेत असताना त्यांची मुलं जर उपाशी राहत असतील तर काय करणार?”, असं उदयनराजे म्हणाले.

    “हिंदू-मुस्लिम हे ते, सर्वांना उदंड आयुष्य लाभो, पण चुकून काय झालं, तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात, तसं कोणी जाऊ नये, पण त्या वेळेस तुम्ही काय विचार करत नाही की, तुझा ब्लड ग्रुप काय ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह. जे चाललंय ते कोणालाही मान्य नाही, काही लोकांना मान्य असेल. मी त्या कुटुंबातील घटक आहे म्हणून बोलत नाही. पण मला तर अजिबात चालत नाही. ते बघून मला मानसिक त्रास होतो. छत्रपती शिवाजी महाराजांना हे अभिप्रेत होतं का? होतं का?”, असे सवाल उदयनराजे भोसले यांनी केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed