Operation Sindoor : भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती पाहता, प्रमुख शहरांमध्ये मॉकड्रिल करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केले. एकीकडे ठिकठिकाणी मॉकड्रिल सुरू असतानाच, दुसरीकडे भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्धवस्त केले
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती पाहता, प्रमुख शहरांमध्ये मॉकड्रिल करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केले. एकीकडे ठिकठिकाणी मॉकड्रिल सुरू असतानाच, दुसरीकडे भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्धवस्त केले. यादरम्यान देशभरात ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. सीमेसह अंतर्गत सुरक्षा महत्त्वाची असल्याने सर्व यंत्रणांना अॅलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे.
मुंबईसारखे शहर कायम दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असते. याआधी अनेकदा मुंबईत बॉम्बस्फोट तसेच आत्मघाती हल्ले करण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिस सावध झाले आहेत आणि नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. नागरिकांनी अफवा पसरवू नयेत तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, संशयास्पद वस्तू अगर व्यक्ती नजरेस पडल्यास त्याची माहिती त्वरित द्यावी, असे पोलिसांनी म्हटले आहे.
Pragati Jagdale : आम्ही मोदींच्या लेकी, वडिलांनी न्याय मिळवून दिला; डोळ्यादेखत कुंकू पुसलं गेलं, ऑपरेशन सिंदूर नाव ऐकताच रडू कोसळलं, प्रगती जगदाळेंच्या भावना
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बुधवारी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्यासह विविध देशांच्या समपदस्थांशी संवाद साधून त्यांना भारताने केलेल्या कारवाईची माहिती दिली. ‘भारताने आक्रमणाची व्याप्ती मर्यादित ठेवली. मात्र, पाकिस्तानने प्रतिहल्ला केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल,’ अशी भूमिका डोवाल यांनी या अधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केली.
Mumbai News : अफवा पसरवू नका, पण सावध रहा! मुंबईत सतर्कता, सुरक्षा यंत्रणा अलर्ट, कारण…
डोवाल यांनी अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया आणि जपानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना भारताच्या कारवाईविषयी माहिती दिली. चीन, रशिया आणि फ्रान्सच्या अधिकाऱ्यांशीही त्यांनी संपर्क साधला. भारताने केलेल्या कारवाईबाबत त्यांनी दूरध्वनीद्वारे सविस्तर माहिती दिली. तसेच त्यामागील भारताची भूमिका देखील स्पष्ट केली. येत्या काही दिवसांत ते इतर देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशीही बोलणार आहेत.
Uddhav Thackeray : आधी राज ठाकरे म्हणाले एअर स्ट्राईक योग्य वाटत नाही, आता उद्धव ठाकरे म्हणतात पाकिस्तानचे भारतातील ‘स्लीपर्स सेल’…
‘भारताला युद्ध लढण्याची इच्छा नाही. मात्र, पाकिस्तानने प्रतिहल्ला केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. भारत त्यासाठी सज्ज आहे,’ यावर डोवाल यांनी भर दिला. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी चर्चा केली, असे अमेरिकेने म्हटले आहे.

