• Sun. Jun 14th, 2026
    सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आले, तलावात बैल धुवायला गेले अन्… दोघांचा बुडून मृत्यू

    Chhatrapati Sambhajinagar Boys Down: छत्रपती संभाजीनगर येथे मामाच्या घरी आलेले तिघे बैल धुताना तलावात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, एकाला वाचवण्यात यश आलं आहे.

    (फोटो– Lipi)

    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: मामाच्या गावी आलेले तिघे बैल धुण्यासाठी गावाजवळील साठवण तलावात गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. प्रसंगावधान राखत एका १८ वर्षीय तरुणीने तलावात उडी घेऊन १३ वर्षीय मुलाला वाचवले आहे. ही घटना शनिवारी सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथे घडली आहे. मामाच्या गावी आलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यासाठी तर धाडस करून मुलाचा जीव वाचवणाऱ्या मुलीचं कौतुक होत आहे.

    अखिल शकील पठाण (वय 18, राहणार नांदगाव तांडा), रेहान भिकन शेख (वय 15 सातगाव डोंगरी तालुका पाचोरा) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. तर शाकीप कलंदर पठाण (वय 13 राहणार घाटनांद्रा तालुका सिल्लोड) असं जीव वाचलेल्या मुलाचे नाव आहे.

    याप्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने रेहान भिकन शेख हा सोयगाव तालुक्यात नांदगाव तांडा येथे राहणाऱ्या शकील पठाण यांच्याकडे आला. तर, सकीप अलकंदर पठाण हा त्याच्या बहिणीकडे आला होता. दरम्यान, अखिल, रेहान, साकिब हे तिघे भिकन शेख यांना न सांगताच बैल धुण्यासाठी गावाजवळील साठवण तलावावर गेले.
    Thane News: लिफ्टने 17व्या मजल्यावर गेली अन्… कल्याणमध्ये 35 वर्षीय महिलेने आयुष्य संपवलं, घटना CCTVत कैद
    बैल भूत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे पाण्यात बुडाले. यावेळी शेजारी कपडे धुत असलेल्या मनीषा कैलास बागुल या १८ वर्षीय तरुणीला ही बाब लक्षात आली. तिने प्रसंगावधान राखत थेट तलावात उडी घेतली. तब्बल 23 मिनिटे पोहत मनीषा तलावात मुलांचा शोध घेत होती. अखेर तेरा वर्षीय साकीब हा मनीषाच्या हाती लागला. तिने अथक प्रयत्न घेऊन साकीबला पाण्याच्या बाहेर काढले. हा थरारक प्रसंग पाहून महिलांनी आरडाओरड सुरू केला. यामुळे गावकरी तलावाजवळ जमले. यावेळी पाण्यात बुडालेल्या अखिल आणि रेहान या दोन मुलांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आला. यावेळी डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषित केले.

    Chhatrapati Sambhajinagar: सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आले, तलावात बैल धुवायला गेले अन्… दोघांचा बुडून मृत्यू, छत्रपती संभाजीनगरात हळहळ

    मनीषा बागुल या तरुणीच्या धाडसाचं कौतुक

    दरम्यान, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे गावात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. तर, दुसरीकडे 18 वर्षीय तरुणीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखून एका १३ वर्षीय मुलाचा जीव वाचवल्याने मनीषा बागुल या तरुणीच सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed