• Fri. Mar 6th, 2026

    “दुपारच्यावेळी घरातून बाहरे पडून नये”, तो मेसेज खोटा, हवामान खात्याकडून स्पष्टीकरण

    “दुपारच्यावेळी घरातून बाहरे पडून नये”, तो मेसेज खोटा, हवामान खात्याकडून स्पष्टीकरण

    Authored byशितल मुंढे | Contributed by अभिजित दराडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 29 Apr 2025, 8:28 pm

    Pune news : पुण्यात २९ एप्रिल ते १२ मे दरम्यान उष्णतेची लाट येणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हवामान विभागाने या मेसेजला फेक ठरवले आहे. विभागाने सांगितले की, एक महिना आधी तापमान किती असेल हे सांगणे शक्य नाही. सध्या पुण्याचे तापमान ३८ ते ४२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    अभिजीत दराडे, पुणे : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज तूफान व्हायरल होताना दिसतोय. २९ एप्रिल ते १२ मे पर्यंत सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कोणीही व्यक्ती बाहेर (खुल्या आकाशाखाली) जाऊ नये, हा मेसेज व्हायरल होत होता. आता यावर हवामान विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. हा मेसेज फेक असल्याचे हवामान खात्याने सांगितले. त्या मेसेजमध्ये सांगण्यात आले होते की, 29 मे ते 12 मे पर्यंत तापमान हे 45 डिग्रीपर्यंत जाईल. हवामान खात्याने सांगितले की, शास्त्रीय दृष्ट्या एक महिना अगोदर असं कोणतंही तापमान सांगणं अशक्य आहे.

    हवामान खात्याकडून सांगण्यात आले की, आमच्याकडून अशी कोणतीही माहिती दिली गेलेली नाहीये. पुण्याचे सध्याचे तापमान हे 38 डिग्री पासून 42 डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे. परवा दिवशी लोहगावचं तापमान हे 42.6 डिग्री सेल्सिअसपर्यंत दाखवल गेल होत. त्या दिवशीच महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान लोहगावचं होतं. इतके दिवस विदर्भामध्ये सर्वाधिक तापमान होतं. परंतु, काही दिवसांमध्ये तिथे ढगाळ वातावरण झालं.
    Suresh Kalmadi : दिल्लीतून क्लीन चिट, पुण्यात कलमाडी हाऊससमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष, जिथून राजकीय सूत्रं हलायची, तिथेच…
    विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला, त्यामुळे तिथल तापमान हे कमी झाल. पुण्यामध्ये देखील अशी स्थिती काही दिवसांमध्ये होऊ शकते. पुण्यातले तापमान देखील एक ते दोन डिग्री सेल्सिअसने कमी होऊ शकत. २९ एप्रिल ते १२ मे पर्यंत सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कोणीही व्यक्ती बाहेर (खुल्या आकाशाखाली) जाऊ नये. कारण हवामान खात्याने तापमान ४५ अंश सेल्सिअस ते ५५ अंश सेल्सिअसपर्यंत जाईल असे म्हटले आहे, जेणेकरून जर एखाद्या व्यक्तीला गुदमरल्यासारखे वाटले किंवा अचानक आजारी पडले तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

    खोलीचे दार उघडे ठेवा जेणेकरून वायुवीजन होईल, मोबाईलचा वापर कमी करा, मोबाईल फुटण्याची शक्यता आहे, कृपया काळजी घ्या आणि लोकांना माहिती द्या, दही, ताक, सफरचंदाचा रस इत्यादी थंड पेये शक्य तितकी वापरा. ४७ ते ५५ अंश सेल्सिअस दरम्यान वाढत्या तापमानामुळे आणि येत्या काळात क्यूम्युलस ढगांच्या उपस्थितीमुळे बहुतेक भागात गुदमरणाऱ्या वातावरणामुळे, येथे काही इशारे आणि खबरदारी घ्या.

    “दुपारच्यावेळी घरातून बाहरे पडून नये”, तो मेसेज खोटा, हवामान खात्याकडून स्पष्टीकरण

    हे गाड्यांमधून काढून टाकावेत

    गॅस साहित्य, लाइटर, कार्बोनेटेड पेये, सामान्यतः परफ्यूम आणि उपकरणांच्या बॅटरी, गाडीच्या खिडक्या थोड्याशा उघड्या असाव्यात (व्हेंटिलेशन), गाडीची इंधन टाकी पूर्णपणे भरू नका, संध्याकाळी गाडीत इंधन भरा, सकाळी गाडीने प्रवास करणे टाळा, गाडीचे टायर जास्त फुगवू नका, विशेषतः प्रवासादरम्यान.विंचू आणि सापांपासून सावध रहा कारण ते त्यांच्या बिळातून बाहेर पडतील आणि थंड ठिकाणांच्या शोधात उद्याने आणि घरात प्रवेश करू शकतात, असा मेसेज व्हायरल होत होता.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed