Anushka Mone on Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ जण मारले गेले, ज्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी पत्नीसमोरच पतींना गोळ्या घातल्या, डोंबिवलीतील मोने कुटुंबियांचे आधारस्तंभ अतुल मोने यांनाही दहशतवाद्यांनी मारले. अनुष्का मोने यांनी सांगितल्यानुसार, हिंदू आणि मुस्लिम वेगळे करा असे बोलून दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला.
आम्ही निघत होतो इतक्यात फायरिंगचा आवाज आला. आम्हाला वाटले मैदानात गेम चालू आहेत, त्याचा आवाज असावा म्हणूनच खाली पाहिले तर नागरिक सैरावैरा पळत होते काहीतरीत घडल्याचे लक्षात येताच आम्ही सर्वजण खाली उतरायला सुरुवात केली तर आमच्या समोरून आर्मीचा ड्रेस घातलेला आणि डोक्यावर कॅमेरा लावलेले दोन बंदूकधारी येत होते आणि कुठे पळावे हेच आम्हाला कळत नव्हते. बरोबर असलेल्या घोडेस्वरांनी आम्हाला खाली झुकायला सांगितले आम्ही सर्वजण खाली झुकलो. हेमंत जोशी यांनी आम्ही काहीही करत नाही, आम्ही निघून जातो असे म्हणतात त्यातील एकाने क्षणार्धात त्यांच्या डोक्याला गण लावून गोळी झाडली. यानंतर त्यांनी हिंदू आणि मुस्लिम वेगळे व्हा असे म्हणत हिंदू कोण आहे असे विचारले. संजय लेले यांनी आपण हिंदू आहोत असे म्हणत हात वर करताच त्या नराधमांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडली आणि संजय लेले रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यामुळे अतुल मोने यांनी तुम्ही हे काय करताच असे विचारताच या दहशतवाद्यांनी थेट मोने यांच्या पोटात गोळी झाडली. तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, असं अनुष्का मोने यांनी सांगितलं.
दहशतवादाचा नायनाट करण्याची वेळ, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अत्यंत मोठा इशारा, म्हणाले, त्यांची जमीन..
दरम्यान, आम्ही सगळे त्यांना वाचवायचा प्रयत्न करत होतो. मात्र इतक्यात घोडेस्वारने सांगितले तुम्ही पळा तुमचा जीव वाचवा, आर्मी येईल त्यांना वाचवायला. मग आम्ही झाडांचा आधार घेऊन खाली पळालो. आमच्या कुटुंबाचा आधारच हिरावला गेला आम्ही काय करायचं, असं बोलत असताना मोने यांचे डोळे पाणावले. समोर दहशतवादी असताना त्यांनी अनुष्का यांनी त्यांचे पती अतुल यांना कव्हर केलं होतं. पण तरीही नराधमांनी त्यांना गोळी मारली. कुंकवासाठी त्यांनी स्वत:चा विचार न करता भिडल्या पण त्या आपल्या पतीला वाचवू शकल्या नाहीत.

