• Tue. Mar 10th, 2026
    ‘आजोबा झालो आता मोकळा झालोय, मनसोक्त फिरणार’, पण…; पहलगाममध्ये प्राण गमावलेल्या पुण्याच्या गणबोटेंची करुण कहाणी

    Pahalgam Attack deceased Kaustubh Ganbote : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ते त्यांच्या पत्नीसोबत तेथे फिरायला गेले होते. त्यांच्याशी जुळलेला एक किस्सा त्यांचे मित्र सुनील मोरे यांनी सांगितला आहे.

    Lipi

    अभिजीत दराडे, पुणे : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Attack) पुण्यातील कौस्तुभ गणबोटे (Kaustubh Ganbote) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ते त्यांच्या पत्नीसोबत तेथे फिरायला गेले होते. पण अचानक झालेल्या या हल्ल्यात गणबोटेंवरही गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये ते गंभीर जखमी झाले पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्याशी जुळलेला एक किस्सा त्यांचे मित्र सुनील मोरे यांनी सांगितला आहे.

    कौस्तुभ गणबोटे हे अतिशय कष्टातून मोठे झाले होते. कौस्तुभ गणबोटे यांची आई त्यांच्या लहानपणी गेली. त्यांच्या काकीने त्यांचा सांभाळ केला लहानाचं मोठं केलं. कौस्तुभ यांना दोन बहिणी आहेत त्यातील एक बहीण अपंग आहे, त्या बहिणीचा सांभाळ त्यांनी केला. दुसऱ्या बहिणीचं लग्न केलं दोघीही आता चांगलं आयुष्य जगत आहेत. कौस्तुभ हे दोन महिन्यापूर्वीच आजोबा झाले होते. त्यामुळे खूप आनंदात होते आता मी जबाबदारीतून मोकळा झालोय, मनसोक्त फिरणार असं म्हणाले होते. पहिल्यांदा कौस्तुभ हे पुण्याच्या बाहेर फिरण्यासाठी गेले होते आणि त्यांचा असा दुर्दैवी अंत झाला आहे.
    Pahalgam Attack : ‘करारा जवाब देंगे’, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संतापले, म्हणाले, ‘भारताला घाबरवलं जावू शकत नाही’
    काही दिवसांपूर्वी कौस्तुभ गणबोटे यांच्या मुलाचं लग्न झालं होतं, त्यानंतर ते आजोबा झाले. गणबोटे त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत होते त्यामुळे त्यांनी कधी स्वतःसाठी वेळ दिला नाही. मात्र आता आजोबा झाल्यानंतर मी मनसोक्त फिरणार, असं त्यांनी त्यांचे मित्र सुनील मोरे यांना सांगितलं होतं. त्यानुसार कौस्तुभ गणबोटे हे त्यांच्या पत्नीसोबत काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेले होते.

    दोन जिगरी मित्रांचा एकाच ठिकाणी करूण अंत

    कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे दोघे अगदी जिवलग मित्र. संतोष जगदाळे हे नेहमी कौस्तुभ गणबोटे यांच्या दुकानात बसण्यासाठी येत असत. प्रत्येक सुखदुःखात कौस्तुभ आणि संतोष हे दोन मित्र सोबत होते. आयुष्यातील प्रत्येक वाटेवर या दोन मित्रांनी एकमेकांची साथ निभावली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यूही सुद्धा सोबतच झाला आहे.

    आठ दिवसापूर्वी संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे त्यांच्या दुकानात बसले होते आणि तिथेच त्यांचा काश्मीर ट्रिपचा प्लॅन बनला. कौस्तुभ गणबोटे त्यांची पत्नी संतोष जगदाळे त्यांची पत्नी आणि मुलगी असं काश्मीरला जाण्याचं ठरलं. कौस्तुभ गणबोटे हे अतिशय हालाखीच्या परिस्थितीतून पुढे आले होते. कामानिमित्त ते बाहेर जायचे, मात्र फिरण्यासाठी ते कधीच पुण्याच्या बाहेर गेले नाही. पहिल्यांदा पुण्याच्या बाहेर गेले आणि त्यांचा करुण अंत झाला. हे सांगताना सुनील मोरे यांच्या डोळ्यात अश्रू तरळलेले होते.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed