• Wed. Mar 11th, 2026
    शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुखाला भररस्त्यात अडवलं, नंतर वाद घालत संपवलं, नागपुरात खळबळ

    Nagpur Crime News : नागपुरात शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुखाला भररस्त्यात संपवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

    Lipi

    जितेंद्र खापरे, नागपूर : नागपुरात गुन्हेगारीचं सावट अधिक गडद होत असून, शनिवारी सायंकाळी शहरात एक धक्कादायक घटना समोर आली. शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आणि कुख्यात प्रॉपर्टी डिलर अंकुश कडू यांची कपिलनगर परिसरात भररस्त्यात चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

    अंकुश रामाजी कडू (वय ५२, रा. तेगबहादूरनगर) हे शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मोपेडवरून घरी जात होते. त्यावेळी कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हाडा क्वॉर्टर चौकात काही तरुणांनी त्यांना अडवलं. सुरूवातीला वाद घालण्यात आला आणि नंतर चार ते सहा तरुणांनी एकत्र येत त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. पोटावर वार झाल्याने कडू घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पळून गेले.
    Nagpur News : माय-लेक रिक्षातून उतरले, तेवढ्यात मागून भरधाव ट्रक आला आणि… आईच्या डोळ्यासमोर चिमुकल्याचा अंत
    घटनेची माहिती मिळताच पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्रारंभिक तपासात ही हत्या वैयक्तिक वैरातून, विशेषतः जमिनीच्या वादातून झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी सुपारी किलिंगची शक्यता देखील नाकारलेली नाही.
    Pune News : कुटुंबासोबत वॉटर पार्कला गेली ती परत आलीच नाही; एक चूक आणि होत्याचं नव्हतं झालं, काय घडलं?
    अंकुश कडू यांच्यावर प्रॉपर्टी व्यवहारात फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल होते. त्यांनी वादग्रस्त जमिनींवर ताबा मिळवून लोकांना गंडवले असल्याचे उघड झाले आहे. २०१८ पूर्वीही त्यांच्यावर हल्ल्याचे गुन्हे नोंदवले गेले होते. त्यामुळे त्यांचे अनेकांशी वैर होते. शिवाय, त्यांच्यावर काही अनैतिक संबंधांचाही संशय होता, ज्यामुळे हत्या पूर्वनियोजित असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

    Nagpur Crime : शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुखाला भररस्त्यात अडवलं, नंतर वाद घालत संपवलं, नागपुरात खळबळ

    या हत्येच्या घटनेमुळे नागपूर शहरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागपुरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या खून आणि हिंसाचाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क असून, शहरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून मारेकऱ्यांचा शोध वेगाने सुरू आहे. शहरात सतत घडणाऱ्या या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अधिक कडक पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed