• Fri. Mar 20th, 2026
    बीडमध्ये वकील महिलेला बेदम मारहाण, सरपंचासह १० जणांवर आरोप

    Beed Crime News : वाढत्या गुन्हेगारीच्या आणि अमानुषपणे मारहाणीच्या घटना सातत्याने समोर येत असल्याने गेल्या काही महिन्यांत बीड जिल्हा चर्चेत आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण, खोक्याचे कारनामे पाहता मरेस्तोवर व्यक्तीला मारहाण करणं हा बीड जिल्ह्याच्या गुन्हेगारीचा पॅटर्न आहे की काय? असाच सवाल निर्माण झाला आहे. व्यक्तीचं संपूर्ण शरीर काळं-निळं पडेपर्यंत त्याला मारहाण केली जाते.

    Lipi

    दिपक जाधव, बीड : अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकीली करणार्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडुन शेतात रिंगण करून काठ्या आणि जे.सी.बी पाईपने जबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत महिला बेशुद्ध पडल्यानंतर तिला दवाखान्यात उपचाराकरिता दाखल करण्यात आलं होतं. परंतु तिथुनही एका रात्रीत उपचार करून महिलेला घरी पाठवण्यात आलं.

    याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेने गावातील ध्वनि प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात, घराजवळ लाऊडस्पीकर लाऊ नयेत याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या. आपल्याविरोधात तक्रार केली म्हणून गावच्या सरपंच आणि इतर दहा पुरूषांनी मिळुन वकिल महिलेला शेतात रिंगण करून काठ्या आणि JCBपाईपने जबर मारहाण केली. महिलेचं शरीर काळं-निळं पडेपर्यंत महिलेला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत महिला बेशुद्ध झाली. उपचाराकरिता तिला दवाखान्यात दाखल करण्यात आलं. परंतु व्यवस्थित उपचार न करता महिलेला एका रात्रीच घरी पाठवण्यात आलं. या महिलेचे अंगावर वळ उठलेले फोटोही व्हायरल झाले आहेत. सरपंच आणि इतर दहा पुरूषांनी मिळुन एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य आहे? गावात सरपंचाचा कारभार कसा असेल? कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

    वाढत्या गुन्हेगारीच्या आणि अमानुषपणे मारहाणीच्या घटना सातत्याने समोर येत असल्याने गेल्या काही महिन्यांत बीड जिल्हा चर्चेत आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण, खोक्याचे कारनामे पाहता मरेस्तोवर व्यक्तीला मारहाण करणं हा बीड जिल्ह्याच्या गुन्हेगारीचा पॅटर्न आहे की काय? असाच सवाल निर्माण झाला आहे. व्यक्तीचं संपूर्ण शरीर काळं-निळं पडेपर्यंत त्याला मारहाण केली जाते. संपूर्ण महाराष्ट्रभर संतोष देशमुख हत्याप्रकरण गाजतंय. किती अमानुषपणे त्यांना संपवण्यात आलं हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं आहे. त्यानंतरही अशा प्रकारच्या अनेक घटना बीडमधून समोर आल्या आहेत. यावेळी एका महिलेला अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. आता पोलिस प्रशासन, सरकार आणि राज्य महिला आयोग काय पाऊल उचलणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *