Marathwada Water Crisis: मराठवाड्यात तीन जिल्ह्यातील तहानलेले ७७ गावे व १६ वाड्यांना मिळून १२७ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु असून उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता पुढील काळात टँकरच्या संख्येत भर पडले, असे चिन्ह आहे.
दिवसेंदिवस तहानलेल्या गावाच्या संख्येत भर पडली त्यानूसार टँकरच्या संख्येतही प्रशासनाला वाढ करावी लागली. मार्च अखेरच्या अहवालानूसार जिल्ह्यातील ४२ गावे व ६ वाड्यांना ५१ टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागला. तर आजघडीला तहानलेल्या ६१ गावे व १० वाड्यांना मिळून ९३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यासह जालना जिल्ह्यातील १४ गावे आणि ६ वाड्याना ३२ टँकरद्वारे, नांदेड जिल्ह्यातील २ गावांना २ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
सासरच्यांना गुंगी देऊन सोन्यासह पसार, नाशिकची ‘लुटेरी दुल्हन’ सापडली, नवीन स्थळाच्या नादात फसली
अशा प्रकारे मराठवाड्यातील या तीन जिल्ह्यातील तहानलेले ७७ गावे व १६ वाड्यांना मिळून १२७ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु असून उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता पुढील काळात टँकरच्या संख्येत भर पडले, असे चिन्ह आहे. तर विभागातील अन्य जिल्हे सुदैवाने अद्यापही टँकरमुक्त आहेत.
हाउज द जोश! ८० वर्षीय तरुणाची बडोदा ते नाशिक धाव; सप्तशृंगीदेवीचे अनोख्या पद्धतीने घेणार दर्शन
विहिरींचे अधिग्रहण पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनू शकतो. त्यामुळे संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता परभणी, लातूर व धाराशिव वगळता विभागातील उर्वरित जिल्ह्यातील खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ७ एप्रिलच्या अहवालानूसार १४० खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७०, जालना २६, हिंगोली १५, नांदेड ३६ आणि बीड जिल्ह्यात ३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. यात टँकरसाठी ४३ गावांतील ५८ विहिरीचे तर टैंकर व्यतिरिक्त ७६ गावातील ८२ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे

