• Fri. Mar 20th, 2026

    गणेश नाईकांबद्दल संजय शिरसाटांचे मोठे विधान, म्हणाले, प्रत्येकाला मेळावे घेण्याचे अधिकार

    गणेश नाईकांबद्दल संजय शिरसाटांचे मोठे विधान, म्हणाले, प्रत्येकाला मेळावे घेण्याचे अधिकार

    Edited byशितल मुंढे | Contributed by सुशील राऊत | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 10 Apr 2025, 2:45 pm

    Sanjay Shirsat News : मंत्री संजय शिरसाट यांनी संभाजीनगरमध्ये विविध विषयांवर भाष्य केले. एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर त्यांनी भाष्य केले. गणेश नाईक यांच्या मेळाव्यावर त्यांनी भाष्य केले. ​लोकसभेला कसा विजय मिळाला, यावरून त्यांनी विरोधकांना टोमणा लगावला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : मंत्री संजय शिरसाट हे संभाजीनगरमध्ये असून त्यांनी अनेक विषयांवर थेट भाष्य केले. एसटी महामंडळाची अवस्था वाईट असून लवकरात लवकर पेमेंट देण्याचे काम सुरू असल्याचे शिरसाटांनी म्हटले. गेल्या काही दिवसांपासून एसटीचा मुद्दा हा चांगलाच गाजताना दिसला. गणेश नाईकांबद्दल बोलताना शिरसाट म्हणाले, दोन्ही पक्षांचा मिक्सिंग करू नका. प्रत्येक मंत्र्याला कोणत्याही भागात जाऊन मेळावे घेण्याचा अधिकार आहे .यांचा महापौर होईल किंवा त्यांचा पक्ष वाढवण्याचा गणेश नाईक आणि सहकारी करत असतील यावर आक्षेप नाही.

    जमीन अतिक्रमित आहे असे म्हणणे चुकीचे आहे. मंदिर उभे राहिले त्याला 50 वर्ष झाले. मात्र, वक्फ बोर्ड नोटीस देत असून हे चुकीचे आणि आमचा विरोध आहे. त्याचे अतिक्रमण करता येणार नाही. वक्फ बोर्डाच्या नावे झालेले घोटाळे बाहेर येतील, असेही शिरसाट यांनी म्हटले. तटकरेंबद्दल म्हणाले, अमित शाह मोठे नेते असून हा वाद अमित शाह यांच्यापर्यंत जाणार नाही. त्यांनी फक्त निमंत्रण दिले आहे .
    Chhatrapati Sambhaji Nagar News : डोंगरात फेकून देईन..! बांधकाम व्यवसायिकाला विवस्त्र करुन बेदम मारहाण, छत्रपती संभाजीनगर हादरलंलोकसभेला कसा विजय मिळाला? त्याची कुठ वाच्यता केली का? लोकसभेला विजयी झाले तेव्हा सेना भवन समोर फटाके फुटले होते. त्यांनी सेट केलेल्या नेरेटिव्हचा फायदा झाला होता. हे कामे देशभर सुरू आहे. देशातील एक्सपर्ट टीम विखुरल्या गेल्याने ही योजना लवकर होण्यास टाईम लागत आहे. कामगार उपलब्ध होणे कारणीभूत आहे,असे जलजीवनवर बोलताना संजय शिरसाट म्हणाले.

    हा मुद्दा उपस्थित झाला तर काहींच्या पोटात दुखायला लागले. औरंगजेबची पिलावळ यांचे बाप हे हैद्राबाद येथून येथे येतात आणि यांना बाप बोलण्याची सवय आहे. मी हा मुद्दा मांडणार. आदित्य ठाकरे मोठे नेते असून चंद्रकांत खैरे यांनी बोलू नये.त्यांनी मंत्री पदाच्या काळात मातोश्रीसाठी काय काय केले हे आम्हाला माहीत आहे. खैरे यांचे पक्षासाठी योगदान आहे. खैरे यांना मातोश्रीवर किंमत नाही. त्यांनी यावे त्यांचे स्वागत आहे. अंबादास दानवे यांचा कार्यक्रम संपला आहे. त्यांचं काम झालं आहे. आम्हाला त्याची आवश्यकता नाही.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed