Bouncers for Hawkers in Kandivali Society : कांदिवलीतील एका सोसायटीने फेरीवाल्यांच्या ठिय्याला कंटाळून अखेर बाऊन्सर ठेवले आहेत. हे आठ बाऊन्सर १२ तासांचा पहारा देणार आहेत.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिका हद्दीतील वर्दळीची २० ठिकाणे फेरीवालामुक्त ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या अनुषंगाने मुंबईकरांना पदपथ आणि रस्त्यांचा वापर करताना अडथळा ठरणाऱ्या तसेच आरोग्यासाठी अपायकारक पद्धतीने उघड्यावर अन्नपदार्थाची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात मुंबई महापालिकेकडून कारवाई केली जात आहे. मात्र फेरीवाल्यांचा वावर कमी होत नाही.Vasai News : ‘पंतप्रधान गती शक्ती’ अंतर्गत वसई रोड टर्मिनसला मंजुरी, प्रवाशांना मिळणार महत्त्वाच्या सुविधा
रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिसरात फेरीवाले आढळल्यास त्यावर कारवाईच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. फेरीवाल्यांची वाढलेली संख्या, अनधिकृत फेरीवाल्यांचा वावर यांवरून न्यायालयाने नुकतीच नाराजी व्यक्त करत कारवाईचे निर्देश दिले होते. न्यायालयाच्या निर्देशांनंतर अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे यांवर अधिक कठोर कारवाई करावी, असे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी मार्च २०२५ मध्ये दिले. मात्र मुंबईत कठोर कारवाई होताना दिसत नाही.Kolhapur News : लेकीला दुर्मिळ आजार, भारतात औषधच नाही; वडिलांची इंजेक्शनसाठी धडपड, कोल्हापुरातील हृदयद्रावक कहाणी
Kandivali News : फेरीवाल्यांना ‘बाऊन्सर’चा धाक! महापालिका अपयशी, अखेर सोसायटीकडूनच १२ तासांचा पहारा
या पार्श्वभूमीवर, कांदिवली पश्चिमेकडील महावीर नगरमधील पंचशील हाइट्स एव्ही या सोसायटीने रस्ता, पदपथ फेरीवालामुक्त करण्यासाठी बाऊन्सर तैनात केले आहेत. याबाबत सोसायटीचे अध्यक्ष सचिन सरदेसाई यांनी अधिक माहिती दिली. ‘सोसायटीला लागूनच असलेल्या पदपथांवर मोठ्या प्रमाणात फेरीवाले बसतात. त्यामुळे पदपथावरून चालताही येत नाही. त्यातच रस्त्यांचीही कामे सुरू आहेत. फेरीवाल्यांविरोधात मागील काही वर्षांपासून महापालिकेच्या आर दक्षिण वॉर्डकडे तक्रारी केल्या, त्यांच्यावर कारवाईही झाली. मात्र फेरीवाले पुन्हा ठिय्या मांडतात. त्यामुळे रस्ते, पदपथ मोकळे ठेवण्यासाठी बाऊन्सर अर्थातच सुरक्षारक्षक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे सरदेसाई यांनी सांगितले.