• Sat. Apr 5th, 2025 2:18:31 PM

    ‘…तर आम्ही एकमुखाने एक क्षणाचाही विचार न करता पाठिंबा दिला असता’; उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं

    ‘…तर आम्ही एकमुखाने एक क्षणाचाही विचार न करता पाठिंबा दिला असता’; उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं

    Uddhav Thackeray press Conference : शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर भाजपवर टीका केली. क आर्थिसंकटाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला विश्वासात घ्यायला पाहिजे असं उदव ठाकरेंनी नमूद केलं. विधेयकाचा विषय बाजूस ठेवून आधारित आर्थिक संकटावर चर्चा आवश्यक होतं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. शिंगे गटावरही हिंदुत्त्व सोडल्याच्या मुद्द्यावरून निशाणा साधला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून (Waqf Amendment Bill) शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Press Conference) यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. आम्हाला हिंदुत्त्व सोडलं म्हणणाऱ्या गद्दारांनी कालची भाषणं ऐकताना लाजा सोडल्या होत्या का असा? असं म्हणत ठाकरेंनी शिंदे सेनेवर घणाघाती टीका केली. त्यासोबतच अमेरिकेने वाढवलेल्या कराच्या मुद्द्यावरूही केंद्र सरकारवर निशाणा साधला. जर मोदींनी विश्वासात घेऊन सांगितलं असतं तर एकमुखाने पाठिंबा दिला असता, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

    आपल्या सर्वांना आठवत असेल अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांनी एक महिन्याआधी इशारा दिला होता की भारताने जे काही कर आहेत ते कमी करावेत नाहीतर आम्हीसु्द्धा जशात तसे करू. त्या कराच्या आकरणीला त्यांनी सुरूवात केली आहे. शेअर मार्केट कोसळणे अशी बातमी आहे. मला अशी अपेक्षा होती की देशाच्या आर्थिक पाठकवण्याचा हा विषय आहे. देशावर आर्थिक संकट आदळेल की काय अशी परिस्थिती असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री आणि देशाच्या परराष्ट्र मत्र्यांनी बाकीचे सगळे विषय बाजूला ठेवत देशाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. या संकटाचा आपण कसा प्रतिकार करणार आहोत, काय पाऊल उचलण्याची गरज आहे. मी मुख्यमंत्री असताना चीन आपल्या अरूणाचल भागामध्ये घुसला होता. तेव्हा कोरोनाचा काळ होता, मोदींनी व्हिडीओ कॉन्फरिंग घेतली होती. तेव्हा सर्व राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रमुख नेत्यांना विश्वासात घेतलं होतं. त्यावेळी आम्ही सर्वांनी त्यांना सांगितलं होतं की, देशाचे पंतप्रधान आहात, देशाच्या हिताचे निर्णय घ्याल त्याला आमचा पाठिंबा असेल. आताही जे येणाऱ्या आर्थित संकट आहे त्याबद्दल विश्वासात घेत हे सांगितलं असतं तर आम्ही एकमुखाने एक क्षणाचाही विचार न करता पाठिंबा दिला असता. पण आता असं वाटत आहे की त्याच्याकडे दुर्लक्ष व्हावं कारण आपण पाकिस्तानला इशारा देऊ शकतो. चीनला देऊ शकत नाही आणि अमेरिका फार दूर राहिली. त्यामुळे आता ते जे करतील ते भोगत बसायचं आणि ते भोगतोय हे आपल्याला कळू द्यायचं नाही. किमान आजतरी लोकसभा आणि राज्यसभेत सगळे विषय बाजूला ठेवत आर्थिक संकटाबद्दल देशाला शासकीय भाषेत अवगत केलं पाहिजे. पण त्यांच्याकडून अपेक्षा करणं चुकीचं ठरेल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

    ईद झाली, या सगळ्यांनी ईदच्या मेजवाणी झोडल्या आता ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आहे. एक योगायोग असा आहे की मंत्री किरेन रिजिजू यांनी बिल मांडलं, ज्यांनी आधी गोमांस खाण्याचं समर्थन केलं होतं. हा योगायोग किंवा ठरवून आणलेला योगायोग आहे. लोकांना लढवायचं, झुंजवायचं आणि आपण आफल्या राजकीय पोळ्या भाजायच्या असं विकृत राजकारण भाजप करतं. वक्फ बोर्डाच्या काही सुधारणा चांगल्या आहेत पण भाजपचे खायचे दाखवायचे दात वेगळे असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली.

    हिंदुत्त्व आम्ही सोडलेलं नाही – उद्धव ठाकरे

    कलम ३७० रद्द झाल्यावर कश्मिरी पंडितांना घरे मिळालीत का? मुस्लिमांचा जिन्हांहूनही अधिक कळवळा काल भाजपत्या नेत्यांना होता. गद्दारांचं म्हणणं आहे की, आम्ही हिंदुत्त्व सोडलं मग काल जी काही भाषणे सुरू होती तेव्हा तुम्ही लाज सोडली होतीत का? आम्हाला हे मान्य नाही असे का बोलला नाहीत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांची शिंदे सेनेवरही निशाणा साधला.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed