• Tue. Sep 8th, 2026
‘सरकारकडे आता पैसे नाहीत, ही देखील योजना बंद…’ लाडकी बहीण योजनेवरुन राज ठाकरेंचं मोठं विधान

Raj Thackeray on Ladki Bahin Yojana : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात शिवतिर्थावरुन लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं. सरकारने दिलेल्या आश्वासनांवर प्रश्न विचारा असंही ते म्हणाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तोफ शिवतिर्थावरुन धडकली. गुढीपाडव्यानिमित्ताने झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी राज्यातील अनेक विषयांवर भाष्य करत, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधलं. राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने जाहीर केलेल्या, या योजनेनंतर अनेक महिलांनी भाबडेपणाने मतदान केल्याचं सांगत, लाडकी बहीण योजनेवरुनही त्यांनी सरकारवर टीका केली.

निवडणुकीआधी शेतकरी कर्जमाफी करू सांगतिलं होतं, पण….

‘निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी जातीचं राजकारण केलं जातं. निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असं सांगितलं होतं. पण अजित पवार म्हणाले ३० तारखेपर्यंत कर्ज भरुन टाका, कर्जमाफी होणार नाही. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही वाट्टेल त्या गोष्टी बोलणार आणि निवडणुका संपल्यानंतर, लोकांनी भाबडेपणाने मतदान केल्यानंतर तुम्ही आता ऐन मोक्यावर बोलणार पैसे भरुन टाका म्हणून.’
Raj Thackeray Speech : मुंबईतील चार नद्या मेल्या, आता पाचवी नदी मरायला आली…मिठी नदीच्या प्रदूषणावरुन राज ठाकरे कडाडले

लाडकी बहीण योजना… सरकारकडे पैसे नाहीत…

‘महाराष्ट्रातील जनतेला मला विचारायचं आहे, की तुम्ही इतक्या भाबडेपणाने मतदान करता तरी कसे. ही लाडकी बहीण योजना… आता या लाडकी बहीण योजनेचे २१०० कोटी करणार, जर २१०० कोटी केले तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवर ६३ हजार कोटीचं कर्ज होईल. म्हणजे पाच वर्षाचे तीन ते चार लाख कोटी होतात. हे पैसे फक्त वाटण्यासाठी. पण ते वाटू शकत नाहीत, सरकारकडे पैसे नाहीत, ती ही देखील योजना बंद होणार. कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितली कोणी?’
Raj Thackeray : ‘…तर आम्हाला पडली आहे ती फक्त औरंगजेबाची,’ राज ठाकरेंची शिवतीर्थावरुन फटकेबाजी, निशाण्यावर कोण?

सरकारने आश्वासन दिलेल्या गोष्टीवर तुम्ही विचारलं पाहिजे –

‘जे मूळ प्रश्न आहेत, जे रोजगाराचे प्रश्न आहेत, महाराष्ट्रातील मराठी मुला-मुलींचे जे रोजगाराचे प्रश्न आहेत, ते सोडवा. आस्थापना येतात आणि तुम्ही बाहेरच्या लोकांना कंत्राटी कामगार म्हणून भरतात. महाराष्ट्रातील मुला-मुलींना कळत नाहीये, कारण आपण गुंतवले कशात, तर जातीत गुंतवले आहेत. मारामाऱ्या करा, डोकी फोडा, व्हॉट्सअॅपवर जातीतून शिव्या घाल्या, हे उद्योग सुरू आहेत. मूळ प्रश्नांकडे कोणाचं लक्ष आहे? मूळ प्रश्नांवरुन तुम्ही मंत्र्यांना, सरकारला धारेवर धरलं पाहिजे, निवडणुकीच्या तोंडावर ज्या प्रकारची आश्वासनं दिली, त्या गोष्टी तुम्ही विचारल्या पाहिजेत. पण मुळात आपलंच लक्ष नसेल, तर बाकीच्यांचं फावणारच आहे.’

Raj Thackeray : ‘सरकारकडे आता पैसे नाहीत, ही देखील योजना बंद…’ लाडकी बहीण योजनेवरुन राज ठाकरेंचं मोठं विधान

‘सगळे जाती-पातीचे सगळे भेद बाजूला गाडून एक मराठी म्हणून उभं राहिलं पाहिजे. बाकीच्या राज्यांमध्ये बघा, तामिळनाडूमध्ये हिंदी आणतात त्यांनी सांगितलं येऊ देणार नाही, केरळामध्ये येऊ देणार नाही, पण आपल्याला कळत नाहीये, इतका भांभावलेला मराठी माणूस आजपर्यंत पाहिलेला नाही. तसंच राजकारणाचा इतका झालेला चिखल आजपर्यंत पाहिलेला नाही. देवेंद्र फडणवीस तुमच्या हातात एक चांगलं सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे, याच्याकडे नीट बघा, चांगल्या पद्धतीने मराठी माणसांकडे पाहणार असाल, तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहिलं. प्रत्येक गोष्टीत…. पण प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा,’ असं म्हणत राज ठाकरे यांनी फडवणीसांना सल्ला दिला आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.आणखी वाचा

विद्यार्थी हित, गुणवत्तापूर्ण साहित्य आणि वाचन संस्कृती वृद्धीसाठी प्रकाशकांनी पुढाकार घ्यावा – मंत्री दादाजी भुसे – महासंवाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुखजीत स्टार्च अँड केमिकल्स समवेत ‘मेगा प्रोजेक्ट’ उभारणीसाठी सामंजस्य करार – महासंवाद
समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थेला नवी गती; जेएनपीटीहून मालवाहतुकीचा वाढणार वेग आणि क्षमता – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी – महासंवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed