• Mon. Mar 16th, 2026

    दिशाच्या वडिलांचं ऑफिसमधील महिलेसोबत अफेअर, पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टवर संजय राऊत काय म्हणाले…

    दिशाच्या वडिलांचं ऑफिसमधील महिलेसोबत अफेअर, पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टवर संजय राऊत काय म्हणाले…

    Sanjay Raut Marathi News : दिशा सालियान आत्महत्येबाबत तिच्या वडिलांवर आरोप करण्यात आले आहेत. संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. हा कौटुंबिक आणि व्यक्तिगत प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : गेल्या दोन ते चार दिवसांपासून दिशा सालियान प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. दिशाच्या वडिलांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि काही हाय प्रोफाईल व्यक्तींची नावे घेत दिशाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता मोठा ट्विस्ट समोर आला असून मालवणी पोलिसांनी दिशाच्या आत्महत्येला तिचे वडील कारण असल्याचा उल्लेख क्लोजर रिपोर्टमध्ये केला आहे. दिशाच्या मृत्यूनंतर मालवणी पोलिसांनी तपास करत एक अहवाल सादर केला होता. त्यामध्ये दिशा नैराश्यात होती, तिचे प्रोजेक्टस अयशस्वी झाले होते. तिच्या वडिलांचे ऑफिसमधील एका महिला कर्मचाऱ्यावर पैसे उडवल्याचं नमूद आहे. याचाच धागा पकडत या प्ररकणाबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली जाणून घ्या.

    दिशाच्या कुटूंबात काय अडचणी होत्या मला माहिती नाही. तुम्ही सांगत आहात त्यानुसार त्यांच्या घरामध्ये आर्थिक चणचण होती, ती डिप्रेशनमध्ये होती हा त्यांचा कौटुंबिक आणि व्यक्तिगत प्रश्न आहे. आम्हाला यावर राजकारण करायचं नाही. जे आता तिच्या वडिलांना हाताशी धरून राजकारण करतायेत ते त्यांना लखलाभ. आता पोस्ट मार्टम रिपोर्ट पुन्हा एकदा प्रसिद्ध झाला आहे. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आम्ही समर्थ आहोत, अशा घाणेरड्या विषयाचं राजकारण करून जे महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या कुटुंबावर चिखलफेक करू इच्छितात आणि पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावतात त्यांना लाजा वाटायला पाहिजेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

    बाळासाहेब आज हयात असते तर…- राऊत

    बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर निवेदन केलं होतं त्यावळी ते जीवित होते. त्यानंतर बाळासाहेब यांचं नाव राष्ट्रपुरूषांच्या यादीत गेलं. राष्ट्रपुरुषांचा फोटो वापरण्यावर कोणी आक्षेप घेऊ शकत नाही. राष्ट्र पुरूष हा एका व्यक्तीचा एका कुटूंबाचा होत नाही. याचा फायदा कोणी घेत असेल कर त्यांनी घ्यावा. एकनाथ शिंदेचे लोकं बाळासाहेबांचा फोटो वापरतात. जर बाळासाहेब आज हयात असते तर शिंदे आणि त्यांच्या लोकांना मातोश्रीच्या बाहेर चाबकाने मारलं असतं. हे म्हणतात ना कुणाल कामराला टायरमध्ये घालून मारलं पाहिजे. हे सगळ सत्तेची मस्ती आहे, या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. जर कोणी तुमहाला दुखावणारं वक्तव्य केलं असेल तर त्यासाठी कायदा कोर्टा आहे. आमच्यावरती काही डिफरमेशनच्या केस आहेत, आम्ही कोर्टात जातो. आता जर एखादा मंत्री थर्ड डिग्री द्यायची भाषा करत असेल तर याचा अर्थ महाराष्ट्रात तालिबानी राज्य सुरू असल्याचंराऊत म्हणाले.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed