Sanjay Raut on Devendra Fadnavis : शिवसेना-भाजप संबंधांविषयी बोलताना संजय राऊतांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांची बाजू घेतल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
संजय राऊत काय म्हणाले?
“बाळासाहेब ठाकरे आपल्या बरोबर असतील, तरच या देशात आपण प्रखर हिंदुत्वाचा प्रचार करु शकतो, असं भाजप नेत्यांचं त्यावेळी मत होतं. म्हणून ते शिवसेनेच्या जवळ आले. हिंदूहृदयसम्राट हे महान हृदयाचे नेते होते. त्यांनी सांगितलं, की मतांची विभागणी नको, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण एकत्र काम केलं पाहिजे. बाबरी प्रकरणानंतर, अयोध्येच्या राम मंदिर आंदोलनानंतर आम्ही संपूर्ण देशात निवडणुका लढणार होतो. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची एक लाट देशात तयार झाली होती.” असं संजय राऊत म्हणाले.
“शिवसेनेच्या नावाचं तुफान होतं. लोकसभेला उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात अशा हिंदी भाषिक पट्ट्यात ६० ते ६५ जागा लढायचं आमचं ठरलं होतं. या लाटेत आमच्या किमान ४० जागा निवडून आल्या असत्या, याची आम्हाला खात्री होती. आमची तयारी सुरु असतानाच आम्ही हे ज्यावेळी जाहीर केलं, तेव्हा भाजपचे धाबे दणाणले.” असं संजय राऊत म्हणाले.Pune News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी अलका चौकात रुग्णवाहिका अडवली, शरद पवारांच्या नेत्याकडून व्हिडिओ शेअर
“अटल बिहारी वाजपेयी यांचा बाळासाहेबांना फोन आला. त्यांनी सांगितलं की, तुम्ही देशभरात निवडणुका लढत आहात, त्यामुळे भाजपचं नुकसान होऊ शकतं. हिंदुत्ववादी मतं विखुरतील. त्यामुळे भाजप हरेल, काँग्रेसला फायदा होईल. मी तुम्हाला विनंती करतो, की तुम्ही तुमचे उमेदवार मागे घ्या. बाळासाहेब महान हृदयाचे माणूस होते. त्यांनी आम्हाला सांगितलं, की राज्याबाहेरचे उमेदवार मागे घ्या. अटलजींचा फोन होता, आपण त्यांचा सन्मान राखला पाहिजे. राष्ट्रीय स्तरावर आम्हीच होतो, पण आम्ही त्याग केला” असं संजय राऊत सांगत होते.Kunal Kamra दिसू दे, चोपच देतो; शिंदेंचा शिलेदार भडकला, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मान आहे, पण…
“२०१४ साली एका-एका जागेवर ७२-७२ तास चर्चा चालली आहे. मी होतो त्यात. ओम माथुर त्यांचे प्रभारी होते. आम्ही त्यांचा सगळा खेळ पाहत होतो. पण मी एक नक्की सांगेन, की देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थिती शिवसेना-भाजप युती तुटू नये, या मताचे होते. हे मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो. तेव्हा युतीसंदर्भात त्यांची भूमिका सकारात्मक होती, तरीही भाजपचा वरुन कार्यक्रम आला, त्यानुसार युती तुटली.” असं संजय राऊत म्हणाले.