Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांमध्ये हवामान बदलामुळे पारा वाढला आहे. भारतीय हवामान खात्याने अनेक भागात अवकाळी पावसाचा इशारा दिलाय. मराठवाडा, नांदेड, बुलढाणा, यवतमाळ, परभणी आणि हिंगोलीमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे, तर चंद्रपूर, भंडारा भागात ऑरेंज अलर्ट आहे. या पावसामुळे गर्मीपासून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
या भागांमध्ये हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धुळे नंदूरबार आणि जळगाव भागात ढगाळ वातावरण असेल यासोबतच पाऊस देखील असेल. नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी याठिकाणी विजांसह अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. परभणी आणि हिंगोलीमध्ये अवकाळी पाऊस विज आणि ढगांच्या गडगडाटासह पडेल. परभणी आणि हिंगोलीमध्ये आज येलो उलर्ट देण्यात आलाय.
ढगांच्या गडगडाटासह गारपीटीचा ऑरेंज अलर्ट
चंद्रपूर, भंडारा, गोदिंया, यवतमाळ वर्धा या ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह गारपीटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. कोकण, मुंबई आणि पुण्यात वातावरण सर्वसामान्य राहण्याचाही अंदाज हा वर्तवण्यात आला आहे. या अवकाळी पावसामुळे गरमीपासून थोडा दिलासा नक्कीच मिळणार आहे. अवकाळी पावसाचा इशारा राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान खात्याकडून देण्यात आल्याचे बघायला मिळतंय. सातत्याने गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढताना दिसली.
पुढील तीन दिवस अत्यंत महत्वाचे
काही शहरांमध्ये तर तापमान हे ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाताना दिसले. दुपारच्यावेळी तर घराच्या बाहेर पडणे देखील कठीण झाल्याचे बघायला मिळाले. मार्च महिन्यातच उष्णता वाढताना दिसली. मार्च महिन्यात हवामान खात्याकडून अनेक भागांमध्ये तीन वेळा उष्णतेचा इशारा देण्यात आला होता. होळीनंतर साधारणपणे वातावरणात उष्णता आणि उकाडा वाढतो. मात्र, यंदा तर होळीनंतर अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावताना दिसतोय.

