• Thu. Mar 12th, 2026

    महाराष्ट्राच्या राजकारणात नवा बॉम्ब, दिशा सालियनच्या वडिलांच्या खळबळजनक आरोपांनंतर आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी

    महाराष्ट्राच्या राजकारणात नवा बॉम्ब, दिशा सालियनच्या वडिलांच्या खळबळजनक आरोपांनंतर आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी

    Nitesh Rane demand Aaditya Thackeray Resignation : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यावेळी दिशाच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांनंतर नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या आमदारकीचा राजीनामा मागितला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला आता नवं वळण लागताना दिसत आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दिशाचा सामूहिक बलात्कार करुन हत्या केल्याचा गंभीर आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या तथा मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई पोलीस यांनी दिशाभूल करुन दबाव टाकला असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. तसेच या याचिकेत आमदार आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि दिनो मोर्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दिशाच्या वडिलांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मंत्री नितेश राणे, पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी दिशाच्या मृत्यूबाबत केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे. या आरोपांनंतर मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

    “तुम्ही जास्त वेळ खोटं लपवू शकत नाही. स्वत:चे वडील मुख्यमंत्री होते म्हणून तुम्ही राज्यभर फिरुन बलात्कार करत बसाल, महिलांवर अत्याचार करत बसाल, तुम्ही कुठल्या तोंडाने या सगळ्या गोष्टी करताय? आदित्य ठाकरेंनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. हा फार गंभीर आरोप आहे. एका लोकप्रतिनिधीवर अशा पद्धतीचा आरोप होत असेल तर त्याने तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि चौकशीला सामोरं गेलं पाहिजे. काही केलं नसेल तर चौकशीला सामोरं जा आणि लोकांना कळू द्या की, दूध का दूध आणि पाणी का पाणी”, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
    Jayant Patil : अजित दादांना टोला, मग एकनाथ शिंदे अ‍ॅडजस्ट झाले का? असा सवाल, फडणवीस म्हणाले…

    मंत्री नितेश राणे यांचे गंभीर आरोप

    “एक साधी मुलगी, जी आपलं स्वप्न पुर्ण करण्यासाठी मुंबईला आली होती, त्या मुलीची या लोकांनी सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केली, असा आरोप आता थेट तिच्या वडिलांनी केला आहे. आता आदित्य ठाकरे यांनी थोबाड उघडावं. सत्य सांगावं. सत्य सांगायची हिंमत करावी. आदित्य ठाकरेंनी तात्काळ आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे”, अशी मागणी नितेश राणे करतात.
    जयंत पाटील यांनी जाहीरपणे एकनाथ शिंदेंची मागितली माफी, नंतर फडणवीसांना विचारला सवाल
    “उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी काय-काय केलं हे मी वारंवार सांगत आलेलो आहे. सीसीटीव्ही कॅमेरे कसे गायब केले, मस्टरची पाने कशी फाडली, वॉचमेनला कसं गायब केलं, झोमॅटोचा डिलिवरी बॉय कुठे गेला हे सर्व विषय मी पहिल्या दिवसापासून बोलत आलेलो. आता सत्य बाहेर येणार आहे. या गोऱ्या गोमटा चेहऱ्यामागे कोण मोठा बलात्कारी लपला आहे हे जनतेला कळणार आहे. हा विषय इथपर्यंत थांबणार नाही. पुढे जाऊन या केसमध्ये लहान मुलांचा काय रोल आहे हे पण टप्प्याटप्प्याने बाहेर येणार आहे. ही तर फक्त सुरुवात आहे”, असा मोठा इशारा नितेश राणे यांनी दिला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed