• Thu. Sep 10th, 2026

आदिवासींचे स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक रोजगार निर्मितीला प्राधान्य – मंत्री डॉ. अशोक उईके – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Mar 19, 2025
आदिवासींचे स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक रोजगार निर्मितीला प्राधान्य – मंत्री डॉ. अशोक उईके – महासंवाद




RAJU DONGARE DGIPR MANTRALAY MUMBAIA

मुंबई, दि. १९: आदिवासी बांधवांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमधून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करण्यावर भर दिला जात आहे, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

मंत्री डॉ. उईके यांच्या अध्यक्षतेखाली शूर झलकारी कातकरी एकता महासंघाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक झाली. कातकरी समाजाच्या विविध मागण्याबाबत निवेदन यावेळी देण्यात आले.

RAJU DONGARE DGIPR MANTRALAY MUMBAIA

यावेळी आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त गोपीचंद कदम उपस्थित होते.

मंत्री डॉ. उईके म्हणाले, राज्य शासन आदिवासी समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध रोजगारनिर्मिती योजना, कौशल्यविकास उपक्रम आणि स्वयंरोजगार प्रकल्प राबवत आहे. स्थानिक स्तरावरच आदिवासी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे, जेणेकरून त्यांना स्थलांतराची गरज भासू नये. कातकरी समाजाचे आर्थिक सक्षमीकरण तसेच त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी आगामी काळात नवीन योजना तयार करून त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात येईल. असेही मंत्री डॉ. उईके यांनी सांगितले.

***

शैलजा पाटील/विसंअ

०००







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed