• Fri. Mar 6th, 2026
    Nagpur Violence : नागपूर हिंसाचारावरुन रावसाहेब दानवेंचा थेट काँग्रेसवर आरोप, ‘ती’ नस पकडली

    Raosaheb Danve Allegation over Nagpur Violence : नागपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर राजकीय वातावरण देखील तापल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. विरोधकांनी नागपूर घटनेला सत्ताधारी नेत्यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा परिणाम सांगितलं आहे. पण रावसाहेब दानवेंनी आता काँग्रेसवर आरोपास्त्र डागले आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : नागपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर राजकीय वातावरण देखील तापल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. विरोधकांनी नागपूर घटनेला सत्ताधारी नेत्यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा परिणाम सांगितलं आहे. तर सत्ताधारी देखील विरोधकांवर पलटवार करत आहेत. यातच हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या कारभाराची औरंगजेबाची उपमा दिल्याने वादाला फोडणी मिळाली होती. यामुळे वातावरण तापले आणि भाजपने काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. याचीच नस पकडत रावसाहेब दानवेंनी आता काँग्रेसवर आरोपास्त्र डागले आहे. नागपुरमधील हिंसाचारासाठी दानवेंनी काँग्रेसला जबाबदार धरले आहे.

    माजी खासदार रावसाहेब दानवे म्हणाले, ‘सपकाळ यांच्या वक्तव्यामुळे नागपूरमध्ये दंगलीची घटना घडली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीची तुलना थेट औरंगजेबासोबत केली. सपकाळ यांचं वक्तव्य चुकीचे आहे. यामुळेच नागपूरची घटना घडली आहे.’ तर नागपूरच्या घटनेचा मी निषेध करतो, मात्र महाराष्ट्रात घटना घडल्या नाही पाहिजेत, असेही दानवेंनी नमूद केले.

    औरंगजेबाच्या कबरीचा वाद सध्या उफाळला असून आहे. कबर हटवून टाकावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटना करत आहेत. सोमवारी सकाळपासून नागपुरात या मागणीसाठी आंदोलन सुरु होते. यावरुनच दोन गट आमने-सामने आले. राडा झाला आणि दगडफेक, जाळपोळही करण्यात आली. यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावर विधानसभेत निवेदन सादर करताना मुख्यमंत्री म्हणाले की, नागपूरमध्ये घडलेल्या दंगलीमध्ये सुनियोजित पॅटर्न दिसून येत आहे. तर यावेळी ३३ पोलीस जखमी झाले असून तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी जखमी झाल्याची बाब देखील फडणवीसांनी निवेदनात नमूद केली.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed