• Thu. Aug 27th, 2026
एका विहिरीत धड, दुसऱ्या विहिरीत गाठोड्यात अवयव; १९ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, पुण्यात खळबळ

Pune Crime: शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या दाणेवाडी गावात १९ वर्षांच्या तरुणाचा मृतदेह हातपाय कापलेल्या अवस्थेत आढळला होता. गेल्या चार दिवसांपासून त्याचं शिर आणि बाकीचे अवयव शोधण्याचं काम पोलिसांकडून सुरू होतं.

Lipi

– प्रशांत श्रीमंदिलकर

पुणे: शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या दाणेवाडी गावात १९ वर्षांच्या तरुणाचा मृतदेह हातपाय कापलेल्या अवस्थेत आढळला होता. गेल्या चार दिवसांपासून त्याचं शिर आणि बाकीचे अवयव शोधण्याचं काम पोलिसांकडून सुरू होतं. आज अखेर त्या परिसरात असलेल्या दुसऱ्या विहिरीमध्ये एका कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत त्या मृतदेहाचं शिर आणि हात, पाय आढळले आहेत. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

माऊली सतीश गव्हाणे (वय १९) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. माऊली हा ७ मार्चला शिरूर येथे बारावीचा पेपर देण्यासाठी आला होता. मात्र त्यानंतर तो गायब झाला होता. कानात असलेल्या बाळीवरून माऊलीच्या आईने मृतदेह ओळखला. त्यांनी मृतदेह पाहताच एकच टाहो फोडला. एवढा काय गुन्हा केला की एवढ्या निर्दयीपणे आमच्या बाळाला मारलं, असा सवाल करत कुटुंबानं आक्रोश केला.
तेच गाव, तेच ठिकाण; खोक्याला घेऊन पोलिसांची परेड; तपासाला वेग, २ महत्त्वाचे पुरावे हवेत
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ७ मार्चला माऊलीचा बारावीचा पेपर होता. तो पेपर देण्यासाठी तो दाणेवाडी येथून शिरूर येथे आला होता. मात्र त्यांतर तो गायब झाला होता. त्यानंतर गावाजवळ असणाऱ्या एका विहिरीत हातपाय आणि मुंडकं नसलेला मृतदेह सापडला होता. त्यामुळे हा मृतदेह नक्की कुणाचा याबाबत गूढ वाढलं होतं. दाणेवाडी गावकऱ्यांनी शिरूर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं.

अखेर आज सकाळी बाजूला असलेल्या विहिरीमध्ये पोत्यात बांधलेल्या अवस्थेत एक गाठोडं सापडलं. त्या गाठोड्यात काही दगडदेखील आढळून आले. मात्र त्याची तपासणी केली असता त्यात दोन हात, पाय, व शिर (डोकं) सापडलं. कुटुंबियांना याची ओळख पटवण्यासाठी बोलावण्यात आलं. कानातल्या बाळीवरून तो मृतदेह माऊलीचा असल्याचं कुटुंबियांनी सांगितलं.
औरंगजेबाच्या कबरीजवळ बंदोबस्त वाढवला; SRPFची तुकडी, २ अधिकारी तैनात; कसून तपासणी, काय घडतंय?
पोलीस या घटनेचा तपास करत असून धक्कादायक घटनेने पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. बारावीत शिक्षण घेणाऱ्या एका १९ वर्षांच्या मुलाची एवढ्या निर्घृणपणे हत्या केली जाते हे अतिशय धक्कादायक असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध पोलिसांनी लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी दानेवाडी ग्रामस्थ व मृत माऊली गव्हाणे याच्या कुटुंबाने केली.

पिंपळवंडीतील बालिका अत्याचार व हत्या प्रकरणी पीडित कुटुंबाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली भेट – महासंवाद
नेपाळमधील पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांसाठी केंद्र सरकारशी संपर्कात- आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन – महासंवाद
Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी बापाची लेक, स्पर्धा परीक्षेसाठी हॉस्टेलवर ठेवलं, 22 वर्षीय तरुणी बेपत्ता; मैत्रिणीच्या जबाबामुळे प्रकरणात नवीन ट्विस्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed