• Sun. Mar 8th, 2026
    इफ्तारसाठी घराकडे निघाले, पण भरधाव वेगाने घात केला; स्कॉर्पिओ ट्रकला धडकली अन् रमजानमध्ये कुटुंबावर आभाळ कोसळलं

    Nanded News : नांदेड-नागपूर महामार्गावरील पिंपळगाव पाटीजवळ शनिवारी सायंकाळी थरकाप उडवणारा अपघात घडला आहे. भरधाव वेगातील स्कार्पिओ गाडीने एका पादचाऱ्याला उडवले आहे. त्यानंतर अनियंत्रित झालेली स्कार्पिओ गाडी पलटी होऊन आणि दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला जोरदार धडकली. यामध्ये दोघांनी जीव गमवावा लागला आहे.

    Lipi

    अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड-नागपूर महामार्गावरील पिंपळगाव पाटीजवळ शनिवारी सायंकाळी थरकाप उडवणारा अपघात घडला आहे. भरधाव वेगातील स्कार्पिओ गाडीने एका पादचाऱ्याला उडवले आहे. त्यानंतर अनियंत्रित झालेली स्कार्पिओ गाडी पलटी होऊन आणि दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला जोरदार धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की घटनेनंतर दोघांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

    वृत्तानुसार, अर्धापूरहून नांदेडच्या दिशेने स्कॉर्पिओ गाडी भरधाव वेगाने जात होती. या गाडीत सहा जण होते. पिंपळगाव पाटी जवळ रस्ता ओलांडून जात असलेल्या एका व्यक्तीला स्कॉर्पिओने धडक दिली. त्यानंतर वाहन चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी होऊन डिव्हाईडरला ओलांडून विरुद्ध दिशेला गेला आणि नांदेडहून अर्धापूरकडे जाणाऱ्या ट्रकवर आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातानंतर गाडीमध्ये असलेले सहाही जण गाडीखाली दबले गेले. स्थानिक नागरिकांनी धाव घेत जखमींना बाहेर काढले. रुग्णवाहिकेने त्यांना तात्काळ नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.
    वाटेतच ब्रेक फेल झाल्याने ST ५० फूट खोल दरीत कोसळली, झाडाझुडपांत अडकली अन्…; अनेकजण जखमी
    या अपघाताता सय्यद हुजैफ (वय ३२) आणि शेख सलाम (वय ३०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दोघेही रहिवासी नांदेड शहरातील पाकीजा नगर येथील रहिवासी होते. तर शेख मस्तान शेख झैनुद्दीन (वय ३०, साई नगर, नांदेड), सय्यद एजाज सय्यद ग़ौस (वय २५), सय्यद फज़ल सय्यद ग़ौस (वय २७), नौमान खान हबीब खान (वय २०), शेख रिजवान शेख अलीम (वय २२), शंकर बोडके (पिंपळगाव, नांदेड) आदी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

    दरम्यान अपघातग्रस्त मुस्लीम असून ते इफ्तारीसाठी नांदेडमध्ये आपल्या स्वगृही परतत होते. पण त्यांच्यावर वाटेतच काळाचा घाला पडला आहे. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला होता, त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. रमजान महिन्यात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृत तरुणांच्या कुटुंबीयावर आभाळ कोसळले आहे. या मार्गावर यापूर्वी देखील अनेक अपघात घडले आहे. वेगाने वाहन चालवणाच्या नादात अपघाताला बळी पडत आहेत.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed