• Mon. Jun 8th, 2026
    शिमगोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर, मध्य रेल्वेची विशेष गाडी, कधी-कुठून सुटणार जादा ट्रेन

    Holi Special Train Konkan Railway : शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे जादा गाड्या सोडणार आहे. जाणून घ्या कधी आणि कुठून सुटणार विशेष ट्रेन.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर मुंबईवरुन कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईतून कोकणात जाण्यासाठी रेल्वे गाड्यांना नेहमीच गर्दी असते. विशेषतः कोकणातील गणेशोत्सव आणि शिमगोत्सव या काळात कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते आणि यात ट्रेनचं तिकीट न मिळणं, रेल्वेला प्रचंड गर्दी यामुळे चाकरमान्यांचे हाल होतात. आजपासून कोकणात शिमगोत्सव सुरू झाला आहे. आज पहिली होळी आहे. याच पार्श्वभूमीवर कोकणात गावी येण्यासाठी मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई येथील चाकरमान्यांना सोपं व्हावं यासाठी मुंबईतील दादर या मध्यवर्ती रेल्वे स्थानकातून कोकणात शिमगोत्सवासाठी विशेष दोन रेल्वे गाड्या सोडल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेकडून या विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत.
    Chalisgaon News: ‘मैत्रिणींनो मस्त जगा, कोणता दिवस शेवटचा असेल…’ मृत्यूपूर्वी विवाहितेची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट

    कधी, कुठून, कोणती रेल्वे असणार?

    कोकण रेल्वे मार्गावरील सोडण्यात येणाऱ्या या विशेष ज्यादा गाड्यांसाठी कोणतंही आरक्षण नसेल. थेट रेल्वे गाडीतून तिकीट काढून आरक्षणाशिवाय प्रवास करता येणार आहे. मुंबईतील दादरवरुन कोकणात जाण्यासाठी पुढील प्रमाणे गाड्यांचे नियोजन आहे. दादरवरून रत्नागिरीला जाण्यासाठी होळीसाठी विशेष रेल्वे गाड्या पुढील प्रमाणे आहेत.

    ०११३१ – दादर – रत्नागिरी होळी विशेष गाडी ११, १३ आणि १६ मार्च, २०२५ दुपारी १४:५० ला सुटेल. रात्री २३:४० ला रत्नागिरीला पोहोचेल.

    ०११३२ – रत्नागिरी – दादर होळी विशेष गाडी १२, १४ आणि १७ मार्च, २०२५ पहाटे ४:३० ला सुटेल आणि दुपारी १३:२५ ला दादरला पोहोचेल.
    Ratnagiri News : माझ्या वक्तव्याचा राजकारण करत विपर्यास केला, पुणे स्वारगेट प्रकरणावरुन योगेश कदम यांची स्पष्टोक्ती

    दादर – रत्नागिरी विशेष रेल्वे कोणत्या स्थानकांत थांबणार?

    ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड हे थांबे या विशेष गाड्यांसाठी असणार आहेत.

    Holi Special Train : शिमगोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर, मध्य रेल्वेची विशेष गाडी, कधी आणि कुठून सुटणार जादा ट्रेन

    दरम्यान, या कोकणात जाण्यासाठी असलेल्या विशेष रेल्वे गाड्यांसाठी कोणतही आरक्षण नसल्याने जी कुटुंब रेल्वेतून प्रवास करतात त्यांचे हाल होतात. त्यामुळे काही प्रमाणात आरक्षण असणं, हे आवश्यक होतं असं मत कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणारे प्रवासी कोकण रेल्वेचे अभ्यासक अक्षय अक्षय म्हापदी यांनी व्यक्त केलं आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed