Eknath Shinde Reacted on Abu Azmi Statment : विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार अबू आझमी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अबू आझमी यांनी सोमवारी विधानभवन आवारात माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, ‘औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता.’ यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फटकारले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचे हालहाल करुन ४० दिवस त्यांचा छळ करुन त्यांना निर्घृणपणे मारण्यात आलं हा क्रुरकर्मा म्हणजे औरंगजेब आहे.’ शिंदे संभाजी महाराजांचा इतिहास गिरवत पुढे म्हणाले, ‘आपण छावा सिनेमा पाहिला तर अंगावर काटे उभे राहतील. औरंगजेबाचं कौर्य आणि छत्रपती संभाजी महाराजांचं शोर्य दाखवलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माभिमान बाळगला. त्यांनी धर्माभिमान, राष्ट्राभिमान आणि देशाभिमान सोडला नाही. अशा धर्मवीर संभाजी महाराजांना क्रुरपणे मारलं त्याचं उदात्तीकरण करणं अतिशय दुर्दैवी आहे.’
Ladki bahin yojana : लाडक्या बहिणींनो फक्त थोडे दिवस थांबा, स्पेशल दिवशी तीन हजार रुपये खात्यात, अदिती तटकरेंची घोषणा
शिंदेंनी असेही नमूद केले की, ‘अशा वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा. संभाजी महाराजांनी देशासाठी प्राण अर्पण केला आहे. तर औरंगजेबाचं उत्तम प्रशासक म्हणून कौतुक करणं हे महापाप आहे. अबू आझमींनी माफी मागावी, देशभक्ती दाखवण्याऱ्यावर बोलणं हा देशद्रोह आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या राजवटीत भारताची सीमा ही अफगाणिस्तान आणि बर्मापर्यंत होती. औरंगजेबाच्या राजवटीत भारताचा जीडीपी २४ टक्के होता, त्यामुळे इंग्रज भारताकडे आकर्षित झाले आणि ते भारतात आले, असे वक्तव्य अबू आझमींनी केले आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई धार्मिक नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील लढाई ही राजकीय होती, असेही अबू आझमी म्हणाले.

