Beed Police: मस्सागावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा चर्चेत आला. जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेत्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले.
बीड नको, दुसरीकडे बदली करा, अशी विनंती करणारे अर्ज जिल्ह्यातील १७२ पैकी १०७ अधिकाऱ्यांनी महासंचालक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे केले आहेत. यामध्ये २९ पैकी १५ ठाणेदारांचादेखील समावेश आहे. यावरुन बीड जिल्ह्यातील परिस्थितीचा अंदाज येऊ शकेल. केज तालुक्यातील मस्सागावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा राज्यात सर्वाधिक चर्चेत आहे. ९ डिसेंबरला देशमुख यांची हत्या झाली. त्या प्रकरणात सीआयडीनं नुकतंच आरोपपत्र दाखल केलेलं आहे.
Walmik Karad: अशानं भिकेला लागू! संतोषला धडा शिकवा! कराडचे आदेश; ‘मोकारपंती’वरील VIDEO सीआयडीच्या हाती
बीड जिल्ह्यात धारूर, अंबेजोगाई, परळी-वैद्यनाथ, केज, आष्टी, गेवराई, माजलगाव, पाटोदा, शिरूर, वडवणी तालुके येतात. जिल्ह्यात २९ पोलीस ठाणी आहेत. यात उपनिरीक्षक ते डीवायएसपी अशा १८८ अधिकाऱ्यांची पदं मंजूर आहेत. पैकी १७२ सध्या कार्यरत आहेत. ३० लाख लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर आहे. हे मनुष्यबळ अतिशय तोकडं आहे.
शिंदे सरकारच्या योजनेनं गोची; ‘लाडक्या भावां’मुळे भलतीच अडचण; कॅबिनेटमध्ये वादळी चर्चा
जिल्ह्यात आधीच पोलीस अधिकाऱ्यांची संख्या कमी असताना देशमुखांची हत्या झाल्यापासून राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोपांमुळे अनेक अधिकारी धास्तावले आहेत. बीड जिल्हा नको रे बाबा, अशी त्यांची स्थिती आहे. बीड नको, असे विनंती अर्ज करत अधिकारी बदली मागत आहेत. बाहेरचे अधिकारीही बीडमध्ये काम करण्यास उत्सुक नाहीत.

