My Marathi Kalasangam 2025: मराठी भाषा आणि संस्कृती केंद्रबिंदू मानून ‘मायमराठी-कलासंगम’ सारखा सुंदर उपक्रम राबवणाऱ्या ‘महाराष्ट्र टाइम्स’चे करावे तितके कौतुक कमी आहे’, असे गौरवोद्गार राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी काढले.
‘महाराष्ट्र टाइम्स’ आयोजित ‘मायमराठी-कलासंगम’च्या दुसऱ्या दिवशी ‘शोध युवा प्रतिभेचा’ या स्पर्धेची अंतिम फेरी आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या विजेत्यांचा सन्मान करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात सरनाईक यांनी मायमराठी-कलासंगम या महोत्सवाचे कौतुक केले. यावेळी व्यासपीठावर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, पॉप्युलरचे हर्ष भटकळ, तसेच या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे परीक्षक अभिनेता-लेखक-दिग्दर्शक अभिराम भडकमकर आणि अभिनेत्री मुग्धा गोडबोले उपस्थित होते. यावेळी सरनाईक म्हणाले, ‘मायमराठी-कलासंगमसारखा सुंदर उपक्रम राबविल्याबद्दल मी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला म्हणजेच आम्ही ज्याला प्रेमाने ‘मटा’ बोलतो, त्यांच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो.’
मृत्युदंड नव्हे, जन्मठेप! वयोवृद्ध सज्जन कुमारला कमी शिक्षा, शीखविरोधी दंगलीतील हत्याप्रकरण
‘आदिवासी बांधवांनी संस्कृती टिकवली’
‘महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मायमराठी-कलासंगम’ महोत्सवात कला सादर करायला आलेल्या आदिवासी बांधवांकडे पाहिल्यावर आपल्याला मराठी संस्कृती काय आहे हे लक्षात येते. मराठी संस्कृती यांनीच टिकवली’, असे प्रतिपादन राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी केले.
दिल्ली विधानसभेत हाय व्होल्टेज ड्रामा! ‘आप’चे २१ आमदार तीन दिवसांसाठी निलंबित, काय कारण?
‘सध्या मराठीची अवस्था अशी आहे की, टॅक्सीत बसलो की आपण तो कोण आहे हे पाहण्याआधीच हिंदीत बोलण्यास सुरुवात करतो. मुंबईतही समोरच्या माणसाला मराठीत बोलताना अवघडल्यासारखे वाटते. त्यामुळेच महाराष्ट्रात मराठीची गळचेपी होते की काय असे वाटते. सकाळ झाल्यापासून रात्रीपर्यंत हिंदीत बोलल्याशिवाय व्यवहार पूर्ण होत नाहीत. अशी मुंबईचीच नव्हे, तर मुंबई महानगर परिसराची अवस्था झाली आहे, हे आपण मान्य करायलाच हवे’, अशी वस्तुस्थिती सरनाईक यांनी मांडली.
Mahashivratri 2025: त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी जाताय? मग ही बातमी नक्की वाचा, VIP दर्शनाबाबत मोठी अपडेट
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिला. अर्थातच त्यासाठी मराठीजन, साहित्यिक आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’सारख्या वृत्तपत्राने संघर्ष केला. मराठी भाषा आणि संस्कृतीला केंद्रबिंदू ठेवून होत असलेला हा सोहळा अद्वितीय आहे’, असेही सरनाईक म्हणाले. ‘महोत्सवात कला सादर करायला आलेल्या आदिवासी बांधवांकडे पाहिल्यावर आपल्याला मराठी संस्कृती काय आहे हे लक्षात येते. हे बांधव आपल्या हातातील वाद्य जमिनीवरही टेकू देत नाहीत. ठाणे-पालघर जिल्ह्याची संस्कृती असलेले तारपा हे नृत्य यांनी जपून ठेवले ते असे. मराठी संस्कृतीसुद्धा टिकली ती याचप्रकारे… तिला लोकांनी जपली, वाढवली. त्यामुळेच हा कार्यक्रम इतक्या यशस्वीपणे राबविल्याबद्दल ‘महाराष्ट्र टाइम्स’चे आभार, तसेच यापुढेही या महोत्सवाचा भाग होण्याची संधी मला द्यावी, ही मी विनंती करतो’, असेही सरनाईक म्हणाले.

