Authored byसूरज सकुंडे | Contributed byरहीम शेख | महाराष्ट्र टाइम्स.कॉम24 Feb 2025, 9:04 pm
नागझरवाडी…धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक छोटसं गाव…या गावची एक खास ओळख आहे. या गावातील बहुतांश शेतकरी बटाटयाचं उत्पन्न घेतात. त्यामुळंच या गावची ओळख ‘बटाटयाचं गाव’ अशी झाली आहे. बटाट्याच्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नामुळं या गावातील शेतकरी सधन आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध झालेत.