• Mon. Mar 9th, 2026
    आई आणि आजीनेच दिव्यांग मुलीचा जीव घेतला, नंतर गुपचूप अंत्यसंस्कारही उरकले; ठाण्यातील संतापजनक घटना

    Thane Crime News : अंथरुणाला खिळून असलेल्या १७ वर्षाच्या दिव्यांग मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिला गावी नेऊन गुपचूप अंत्यसंस्कार केल्याच्या प्रकरणात तिच्या आईसह आजीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : अंथरुणाला खिळून असलेल्या १७ वर्षाच्या दिव्यांग मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिला गावी नेऊन गुपचूप अंत्यसंस्कार केल्याच्या प्रकरणात मुलीची आई, आजी आणि अन्य एक महिला अशा तिघींविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. या मुलीला संशयितरित्या गोळ्या दिल्यानंतर मृत्यू झाला असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.

    ठाण्यातील शिवाजी पथ परिसरातील चाळीत ही मुलगी आई, वडील आणि आजीसोबत राहत होती. तसेच, ती जन्मापासूनच दिव्यांग असल्याने अंथरुणाला खिळून होती. तिचे वडीलही गेल्या पाच वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहेत. ठाण्यातच राहणारी मुलीची मावस आत्या मुलीच्या घरी आल्यानंतर तिला ही मुलगी घरात दिसली नाही. त्याचवेळी आत्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील एक व्हिडिओ बघण्यास मिळाला. त्यामध्ये मुलीची आई, आजी, आणि आईची मैत्रीण अशा तिघीजण प्रेतासारखे दिसणारे काहीतरी कापडामध्ये गुंडाळून गाडीमधून घेऊन जात असल्याचे दिसून आले. आत्याच्या तक्रारीनंतर नौपाडा पोलिसांनी चौकशी चालू केली.

    मृत मुलीच्या घरी जात पोलिसांनी मुलीच्या आजीकडे चौकशी केल्यानंतर मृत मुलीला १५ फेब्रुवारीपासून जास्त त्रास होण्यास सुरुवात झाली. या गोष्टीला कंटाळून १९ फेब्रुवारी रोजी रात्री आईने मुलीला कोणत्यातरी गोळ्या दिल्या. मुलीचा मृत्यू झाल्यानंतर रात्री उशिरा मुलीचा मृतदेह वाहनामधूम सातारा जिल्ह्यातील गावी नेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची बाब उघडकीस आली.

    मावस आत्याच्या तक्रारीनंतर मुलीची आई, आजी आणि अन्य एक महिआ अशा तिघांविरुद्ध सोमवारी नौपाडा पोलिस ठाण्यात हत्या, पुरावा नष्ट करणे, गुन्ह्यात मदत करणे आदी कलमातंर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेऊन चौकशी केली जाईल, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed