• Sun. Jun 7th, 2026

    महाशिवरात्रीचा उपवास ठरणार ‘गोड’! साबुदाणा, शेंगदाणा स्थिर, खजूरही आवाक्यात; फळांचीही मुबलक आवक

    महाशिवरात्रीचा उपवास ठरणार ‘गोड’! साबुदाणा, शेंगदाणा स्थिर, खजूरही आवाक्यात; फळांचीही मुबलक आवक

    Mahashivratri 2025: महाशिवरात्रीनिमित्त शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त घरोघरी उपवासासह अनेक ठिकाणी महाप्रसाद करताना फराळाचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून साबुदाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    upwas1

    म.टा..प्रतिनिधी, नाशिक: येत्या बुधवारी (दि. २६) साजऱ्या होणाऱ्या महाशिवरात्रीमुळे काही दिवसांपासून उपवासाच्या फराळाच्या पदार्थांच्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र, मागणी वाढूनही साबुदाणा अन् शेंगदाण्याचे दर स्थिर असल्याने, तसेच खजुराचे दरही आवाक्यात असल्याने सर्वसामान्यांचा महाशिवरात्रीचा उपवास ‘गोड’ ठरण्याची चिन्हे आहेत.

    किरकोळ विक्रेत्यांकडे साबुदाणा ७० रुपये किलो, तर शेंगदाणा १३० रुपये किलो दराने उपलब्ध असून, गतवर्षीच्या तुलनेत खजुराचे दरही १२० ते ३०० रुपये किलो याप्रमाणे आवाक्यात आहेत. मात्र, एकीकडे फराळाचे पदार्थ स्वस्त होत असताना खाद्यतेलाची दरवाढ कायम असल्याचे दिसून आले. महाशिवरात्रीनिमित्त शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त घरोघरी उपवासासह अनेक ठिकाणी महाप्रसाद करताना फराळाचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून साबुदाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे.
    एसटीचे ‘नाथजल’ दिखाव्यापुरतेच! बसस्थानकांवर ५ रुपये जादा आकारणी, प्रवाशांना आर्थिक फटका
    किरकोळ बाजारात साबुदाणा, शेंगदाणा, खजूर, राजगिरा आणि फळांना मागणी वाढली आहे. यंदा साबुदाणा आणि शेंगदाणाही आवाक्यात असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे. गतवर्षी ७५ रुपये किलोने विक्री होणारा साबुदाणा यंदा ७० रुपये किलोने विक्री होत आहे. तर १५० रुपये किलोने विक्री होणारे शेंगदाणे सद्यस्थितीला १२५ ते १३० रुपये किलोचा दर आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काही दिवसांत खाद्यतेलांचे मात्र वाढणार असल्याचेही व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे.
    महाकुंभमेळ्यात आतापर्यंत किती भाविकांनी स्नान केले? खुद्द योगींनीच सांगितला आकडा, म्हणाले…
    कवठ, फळांना मागणीसध्या बाजारपेठेत आंबा आणि द्राक्षांसह विविध हंगामी फळांची मुबलक आवक होत आहे. त्यात प्रामुख्याने पेरू, चीकू, पपई, सफरचंद, तसेच कवठालाही मागणी वाढली आहे. सफरचंदांची आवक मर्यादित असल्याने दर २०० रुपये किलोपासून पुढे आहेत. पेरूचे दर १०० रुपये किलो, पपईचे दर ५० रुपये किलोपासून पुढे आहेत. याशिवाय स्ट्रॉबेरी, मोसंबी, संत्रीची जोरदार खरेदी सध्या ग्राहकांकडून केली जात आहे. खास महाशिवरात्रीसाठी कवठही बाजारात दाखल झाले असून, १० ते २५ रुपयांना ते उपलब्ध आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed