Mumbai Local tilt at turning : काही वेळा तर हे प्रवासी खाली कोसळून जखमी होत असून यापूर्वी प्रवाशांनी लोकलमधून पडून प्राण गमावल्याचे प्रकार घडल्यामुळे याकडे लक्ष देऊन प्रशासनाने तात्काल उपाययोजना करण्याची मागणी मराठी एकीकरण समितीकडून करण्यात आली.
कळवा स्थानकाच्या पुढे पारसिक बोगद्याच्या अलीकडे आणि पुढे तसेच मुंब्रा स्थानकाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या अप आणि डाऊन मार्गावरील वळणांवर, तसेच मुंब्रा स्थानक सोडल्यानंतर दिवा स्थानकाच्या दिशेने दोन्ही अप आणि डाऊन वळणांवरुन प्रवासी गाड्या धावत असताना लोकलचे डबे काहीसे झुकतात, गर्दीच्या वेळेत गाड्यांमध्ये होणाऱ्या अतिरिक्त प्रवासी गर्दीच्या भारामुळे डब्यांत प्रचंड दाटी निर्माण होते. परिणामी, गाडी झुकल्याने प्रवाशांच्या रेट्यामुळे दरवाज्याजवळ डब्याच्या आतील बाजूस उभ्या असलेल्या प्रवाशांचा तोल जाऊन ते डब्याबाहेर फेकले जातात.
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबरप्लेटबाबत परिवहन विभागाचा मोठा निर्णय, आवश्यकता का? किती पैसे मोजावे लागणार?
गर्दीच्या वेळी प्रवासी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावून जिवाच्या आकांताने नाईलाजाने हा लोकल प्रवास करतात. परंतु काहीवेळा दुर्घटना घडून यामध्ये अनेक प्रवासी गंभीर जखमी होत आहे. तर काही जणांचा दुर्दैवी मृत्यू देखील होत आहे. अशा घटना वारंवार घडत असून प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) चे उपाध्यक्ष आनंदा पाटील यांनी रेल्वेचे मध्य रेल्वे महाव्यवस्थापक आणि रेल्वे मंत्रालयाकडे इमेलद्वारे केली आहे.
Mumbai Local Accident : गर्दीमुळे मुंबई लोकलमधून पडून मुलाचा मृत्यू, रेल्वेचा मात्र अजबच दावा, अखेर बापाने न्याय मिळवला
दिव्यातून लोकल सोडा…
कल्याण दिशेकडून येणाऱ्या धीम्या लोकल डोंबिवली स्थानकात प्रवाशांनी तुडुंब भरत असून त्यामध्ये दिव्यात चढण्यासाठी जागा नसल्याने प्रवासी लोकलच्या दरवाजामध्ये लटकतात. त्यानंतरच्या स्थानकांमध्ये जाताना या भागातील वळणे व त्यामुळे लटकणाऱ्या प्रवाशांवरील दाब वाढून त्यांचे हात निसटून लोकलमधून खाली कोसळण्याचा धोका वाढतो.
शिवाय, गर्दीच्या काळात या तीनही स्थानकात सर्वाधिक गर्दी असते. त्यामुळे किमान या स्थानकांसाठी विशेष दिवा लोकल सुरू करण्याची मागणी सातत्याने होत आहे. रेल्वे प्रवासी संघटनांबरोबर सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही दिवा लोकलसाठी आग्रह धरला जात असला तरी अद्याप दिवा लोकल सुरू होत नसल्याने प्रवाशांमध्ये संताप आहे.

