मुळशी धरण परिसरात फिरायला गेलेल्या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दोन्ही मुलं कॉलेजला सुट्टी म्हणून फिरायला मुळशी धरण परिसरात आले होते. पण एका तरुणाला पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्याला वाचवण्यासाठी दुसरा तरुण पाण्यात उतरला. या दोन्ही तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने विशाल आणि अनिश आपल्या मित्रांसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी आले होते. यावेळी चाचीवली गावच्या हद्दीत मुळशी धरणात पोहण्यासाठी उतरले होते. यावेळी दुपारी 12.30 ते 1 च्या दरम्यान विशालला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. मात्र त्याला पकडण्यासाठी अनिश पाण्यात उताराला. मात्र एकमेकांना वाचवण्याच्या नादात दोघेही पाण्यात बुडाले.
महायुतीमधील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर, आमदार सरोज अहिरे यांची भर मंचावरुन अजित पवारांकडे तक्रार
या घटनेची माहीती त्यांच्या अन्य मित्रांना कळविली असता पौड पोलीस स्टेशनचे अतिरिक्त पोलीस निरीक्षक संतोष कुंभार, बिट पोलीस अधिकारी समीर शेख पोलीस,यांनी तात्काळ मुळशी आपत्ती व्यवस्थापन प्रमुख प्रमोद बलकवडे आणि त्यांचे अन्य सहकारी स्कुबा तज्ज्ञ विजय शिवतरे, दिपक कुमार, विलास विलगर, महेश पवार, यांना सोबत घेऊन घटना स्थळी धाव घेतली. त्याचबरोबर 108 रुग्णवाहिनीचे डॉ. अनिरुद्ध सावंत हेही घटना स्थळी दाखल झाले.
रात्री उशिरापर्यंत पानबुड्याच्या माध्यमाने आणि पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली बुडालेल्या दोघांचा शोध कार्य सुरु होते.
