• Fri. Mar 6th, 2026
    उंटांची अवैध वाहतूक, कत्तल थांबवा! मुंबई हायकोर्टात याचिका, २८ फेब्रुवारीला होणार सुनावणी

    राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रमार्गे तेलंगणा व अन्य राज्यांत उंटांची वाहतूक होते. शिवाय या वाहतुकीदरम्यान त्यांची योग्य काळजीही घेतली जात नाही.

    महाराष्ट्र टाइम्स
    camel AI

    मुंबई : ‘उंटांची कत्तल करण्यास कायद्याप्रमाणे प्रतिबंध असूनही महाराष्ट्रातील काही भागांत ती होते. शिवाय राजस्थान, गुजरातमार्गे अनेक उंटांना पायी चालत किंवा वाहनांमध्ये महाराष्ट्रात आणून पुढे दक्षिणेतील तेलंगणा व अन्य राज्यांत कत्तल करण्यासाठी नेले जाते. त्यामुळे महाराष्ट्रातील पोलिस व अन्य प्रशासनांना कायद्याप्रमाणे कारवाई करून याला प्रतिबंध करण्याचे निर्देश द्यावेत,’ अशा विनंतीची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. याविषयी २८ फेब्रुवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

    ‘प्राणीन फाऊंडेशन’ या संस्थेने अॅड. गौराज शाह व समा शाह यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. ‘पुढील महिन्यात ३१ मार्च रोजी रमझान ईद आहे. त्यानिमित्त कत्तल होण्यासाठी अनेक उंटांना पायी नेण्याचा प्रवास अनेक ठिकाणांहून सुरू झाला असेल. त्यामुळे त्यापूर्वी याप्रश्नी सुनावणी घ्यावी,’ अशी विनंती अॅड. गौराज यांनी मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाला शुक्रवारी केली. त्यानंतर याचिकेतील मुद्दे आणि प्रशासनांनी दाखल केलेली प्रतिज्ञापत्रे यातील मुद्दे याचा सारांश सादर करावा, जेणेकरून जलद सुनावणी होऊ शकेल, असे सांगून खंडपीठाने सुनावणीसाठी २८ फेब्रुवारीची तारीख दिली.
    कर्तव्यभार पोलिसांसाठी जीवघेणा; मुंबई पोलिस दलात वर्षभरात सव्वाशे जणांचा ‘ऑन ड्युटी’ मृत्यू
    ‘ईदच्या निमित्ताने कुर्बानीसाठी उंटांची कत्तल होते आणि त्यासाठी राजस्थानमधून अनेक उंटांना दक्षिणेतील राज्यांत नेले जाते, असे एप्रिल-२०२३मध्ये आमच्या निदर्शनास आले. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रमार्गे तेलंगणा व अन्य राज्यांत उंटांची वाहतूक होते. शिवाय या वाहतुकीदरम्यान त्यांची योग्य काळजीही घेतली जात नाही. त्यांना अन्न, पाणी यापासून तासंतास वंचित ठेवले जाते आणि त्यांचे हाल केले जातात. प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे उघड उल्लंघन होते.
    अजबच! एका नोटेमुळे अख्ख्या सोसायटीला फुटला घाम, जो तो बोलतो माझी नाहीच, नोटेवर असं काय?
    शिवाय, कत्तलीला केंद्र सरकारच्या कायद्याने बंदी असूनही त्याला चाप लावला जात नाही’, असे संस्थेने याचिकेत म्हटले आहे. या याचिकेत केंद्र सरकारसह राज्य सरकारचे पशु संवर्धन विभाग, परिवहन विभाग, राज्य प्राणी कल्याण मंडळ, पोलिस महासंचालक अशा अनेकांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed